mpschistory | Education

Telegram-канал mpschistory - MPSC History

126972

Here u can get useful info about History for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCScience @MPSCAlerts @SpardhaGram @MPSCMaterialkatta

Subscribe to a channel

MPSC History

लोकराज्य : डिसेंबर 2025
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक)

जॉइन करा @MPSCMaterialKatta

Читать полностью…

MPSC History

🔰प्राचीन भारत भाग-1

✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

👤 Prof. Sachin Gulig

लिंक
https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z
https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z
========
🎯 Like, Share & Subscribe

Читать полностью…

MPSC History

🌍 विज्ञान: पेशी

🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

🌞 By Rutuja Kirtane

🗓 दिनांक:- 11 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.

🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.

लिंक
https://youtu.be/B21NfQ_legw?si=meB1-0yDEUfLJBju

========
🎯 Like, Share & Subscribe

Читать полностью…

MPSC History

🔴 आज पुण्यतिथी 🔴

🔰 राजे उमाजी नाईक
“प्राईड ऑफ पुरंदर”

👉Link-
https://youtu.be/D2duWwjksaE?si=yyqIGRRMC2b1pn_L

Читать полностью…

MPSC History

🔴 खुशखबर ❗️खुशखबर 🔴

🔺 स्पर्धाग्राम पुन्हा घेऊन येत आहे दर्जेदार कोर्स 🔻

🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

➡️ Online Batch ⬅️

🎯 राज्यसेवेच्या यशाची मजबूत पायाभरणी इथूनच!

🎯MPSC 2026 साठी सखोल व शिस्तबद्ध तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Foundation Batch 2026 सुरू होत आहे.

📚 Batch ची वैशिष्ट्ये :
👤 सर्व तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शक.
✅ संपूर्ण अभ्यासक्रमाचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन.
✅ मूलभूत संकल्पनांपासून शिकवणी.
✅ सराव टेस्ट चा समावेश.
✅ वैयक्तिक मार्गदर्शन व शंका-निरसन.
✅ विश्लेषणात्मक दृष्टिकोन.

“मजबूत Foundation म्हणजे यशाची खात्री!”

📲 Online कोर्ससाठी आजच अँप Download करून घ्या.
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.app

📱अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
मोबाईल: 9545600535
.........
https://wa.me/+919545600535

Читать полностью…

MPSC History

📰 निबंधमाला मासिक

➤ संपादक = विष्णूशास्त्री चिपळूणकर
➤ पहिला अंक = 25 जानेवारी 1874
➤ वार्षिक वर्गणी = अडीच रुपये

➤ पहिल्या अंकाची पृष्ठसंख्या 20 होती तर किंमत दोन आणे असून बाबाजी कृष्ण गोखले यांच्या ज्ञानप्रकाश छापखान्यात त्याची प्रिंटिंग झाली होती.

➤ निबंधमालेचा तिसावा अंक संपवून उठताना त्यांनी आपल्या बंधूंना इंग्रजीत म्हटले होते, आय एम द शिवाजी ऑफ द मराठी लँग्वेज हू हॅड नॉट हीज इक्वल टू प्रीसीड ऑर सक्सिड हिम

➤ 1876 मध्ये इंग्रज सत्तेला विरोध दर्शविणारा "बैलाला तांबडी चिंधी" (Red to a bull) हा लेख विष्णूशास्त्रींनी लिहिला.

➤ नोव्हेंबर 1881 पर्यत निबंधमालेचे 84 अंक प्रकाशित झाले. "आमच्या देशाची स्थिती" या अंकाने निबंधमालेचा शेवट झाला.


✍ माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
━━━━━━━━━━━

Читать полностью…

MPSC History

2026 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी GS ची Strategy Lecture Series

1) Strategy: प्रा.श्याम सर
https://youtu.be/Xt7XQL9dBvk

2) भूगोल: प्रा. तुपे सर
https://youtu.be/g0Bu3qY3jmk

3) राज्यशास्त्र: प्रा. सागर सर
https://youtu.be/hixil3vjKTk

4) विज्ञान : ऋतुजा मॅडम
https://youtu.be/xjGJZMcwMEs

5) इतिहास: सचिन गुळीग
https://youtu.be/45R6MKv0tps

Читать полностью…

MPSC History

संस्था , संघटना व सभासद

जॉईन करा @MPSChistory

Читать полностью…

MPSC History

संस्था , संघटना व सभासद

जॉईन करा @MPSChistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास - समाजसुधारक - जन्म मृत्यू

Читать полностью…

MPSC History

इतिहास - समाजसुधारक - जन्म मृत्यू

Читать полностью…

MPSC History

🔹सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे

* १८२९ : सती बंदीचा कायदा
* १८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.
* १८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.
* १८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना
* १८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव
* १८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.
* १८९१ : विवाह संती वयाचा कायदा.
* १८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.
* १८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत
* १९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.
* १९०४ : अभिनव भारतची स्थापना
* १९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.
* १९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.
* १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.
* १९०६ : बारींद्रकुमार घोष-भूपेन्द्रनाथांचे युगांतर वृत्तपत्र.
* १९०६ : गांधीजीचा द. आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध सत्याग्रह
* १९०७ : भारतीय राष्ट्रीय सभेत फूट.
* १९०८ : लो. टिळकांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा.
* १९०९ : मोर्ले- िमंटो सुधारणा.
* १९०९ : नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून.
* १९१५ : होरूल लीगची चळवळ.
* १९१५ : गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले.
* १९१६ : लखनौ करार.
* १९१७ : भारतमंत्री माँटेग्यू यांची घोषणा.
१९१९ : माँटफर्ड कायदा.
* १९१९ : रौलट कायदा, जालियनवाला बागेतील हत्याकांड.
* १९२० : नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीस मंजुरी.
* १९२१ : ब्रिटनचे राजपुत्र भारतात आले.
* १९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत िहंसा
* १९२२ः राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना.
* १९२३ : झेंडा सत्याग्रह.
* १९२४ : हदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनङ्कची स्थापना.
* १९२७ : बार्डोली सत्याग्रह
* १९२७ मार्च : महाड सत्याग्रह.
* १९२८ : qहदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
* १९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू रिपोर्ट
* १९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना.
* १९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला.
* १९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला.
* १९३० एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.
* १९३१ : गांधी-आयर्विन करार.
* १९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन.
* १९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसèया गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले.
* १९३१ : भगतqसग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.
* १९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
* १९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित
* १९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.
* १९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार
* १९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.
* १९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट मंजूर.
* १९३६ ऑगस्ट : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन
* १९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.
* १९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.
* १९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.
* १९३९ सप्टेंबर ३ : दुसèया महायुद्धाला सुरुवात.
* १९३९ नोव्हेंबर १ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.
* १९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना
* १९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला.
* १९४० ऑगस्ट १७ : वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात.
* १९४० मार्च : राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन.
* १९४० मार्च : क्रिप्स मिशन भारतात आले.
* १९४२ ऑगस्ट ८ : ङ्कछोडो भारतङ्कचा ठराव संत.
* १९४३ ऑक्टोबर २१ : आझाद हिंद सरकार स्थापन.
* १९४३ नोव्हेंबर : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.
* १९४४ मे : आझाद qहद सेनेने ङ्कमॉवडॉकङ्क हे आसाममधील ठाणे qजकले व भारतीय भूीवर पाय ठेवला.
* १९४५ ऑगस्ट १८ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू.
* १९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक.
* १९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना.
* १९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
* १९४६ मार्च १५ : लॉर्ड अ‍ॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.
* १९४६ जुलै : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.
* १९४६ ऑगस्ट १६ : बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना ङ्कप्रत्यक्ष कृतिदिनङ्क पाळण्याचा आदेश.
* १९४६ सप्टेंबर २ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार
* १९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.
* १९४६ फेब्रुवारी १८ : मुंबई येथील ङ्कतलवारङ्क या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.
* १९४७ फेब्रुवारी २८ : पंतप्रधान अ‍ॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले.
* १९४७ जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा.

Читать полностью…

MPSC History

नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.

महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.

अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.
"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश "
गाडगेबाबा प्रबोधन काव्य
भुकेलेल्यांना = अन्न
तहानलेल्यांना = पाणी
उघड्यानागड्यांना = वस्त्र
गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
बेघरांना = आसरा
अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
बेकारांना = रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
दुःखी व निराशांना = हिंमत
गोरगरिबांना = शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!

संक्षिप्त चरित्र :-
गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले.
१९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.
१९२५- मुर्तिजापूर येथे गोरक्षण कार्य केले आणि धर्मशाळा व विद्यालय बांधले.
१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.
"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले.[१]
आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'
१९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
१९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.
गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत.
२० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.

गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते.

गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर :
१४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."
तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.

गाडगेबाबांचे विचार :
एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना...समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, " बिचार्‍या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ?

Читать полностью…

MPSC History

🔹महाराष्ट्र पोलीस भरती महत्त्वाचे - महिलां विषयक कायदे

1. सतीबंदी कायदा -1829

2. विधवा पुनर्विवाह कायदा -1856

3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866

4.भारतीय घटस्फोट कायदा -1869

5. मानवी हक्क संरक्षण कायदा -1993

6. आनंदी विवाह कायदा -1909

7. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986

8. विशेष विवाह -1954

9. हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956

10. विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959

11.अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956

12. वैद्यकी व गर्भपात कायदा -1929

13. हुंडाप्रतिबंधक कायदा -1929

14. बालविवाह निर्बंध कायदा -1929

15. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005

16. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005

17. मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961

18. समान वेतन कायदा -1976

19. बालकामगार कायदा -1980

20. अपंग व्यक्ती कायदा -1995

21. मानसिक आरोग्य कायदा -1987

22. कुटुंब न्यायालय कायदा - 1984

23. राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990

24. माहिती अधिकार कायदा -2005

25. बालन्याय कायदा - 2000

26. भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959

27. अनाथालय व धर्मादाय कायदा - 1960

28. हिंदू विवाह कायदा -1955

29. कर्मचारी विमा योजना -1952

30. प्रसूती सुधारणा कायदा -1961

31. अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा - 1979

32. वेश्या वृत्ती निवारण कायदा -1986

33. हुंडा निषेध कायदा - 1986

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉइन करा @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल...

लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा...

https://youtu.be/hixil3vjKTk?si=9gDrtubCv20hey1M

Читать полностью…

MPSC History

#History
एका पुतळ्याच्या निमित्ताने

Читать полностью…

MPSC History

🔰प्रास्ताविका भाग-1

✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

👤 Prof. Sagar Sir

🗓 दिनांक:- 12 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.

🔔 Notification मिळवण्यास
ाठी Channel Subscribe करून ठेवा.

लिंक
https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9
https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9

========
🎯 Like, Share & Subscribe

Читать полностью…

MPSC History

🌍 भूगोल: विषय सोपा कसा करावा

🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

🌞 By Prof. Arun Tupe Sir

🗓 दिनांक:- 10 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.

🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.

लिंक
https://youtu.be/LHaawk6qZM0?si=qdu3mMwpE2IOaswp
========
🎯 Like, Share & Subscribe

Читать полностью…

MPSC History

📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –

🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉  @eMPSCkatta

🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉  @spardhagram

🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi

✍️ मराठी व्याकरण – @Marathi

✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish

📜 इतिहास – @MPSCHistory

🗺️ भूगोल – @MPSCGeography

🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity

💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics

🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience

🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths

📢 तुम्ही जॉईन केलं का?

Читать полностью…

MPSC History

द ब्रिटिश इंडिया कमिटी (1889)

जॉइन @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

📌 ब्रिटिश काळातील योजना व तरतुदी

➤ क्रिप्स योजना (1942)
👉दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्यात येईल.

➤ वेव्हेल योजना (14 जून 1945)
👉युद्ध समाप्तीनंतर स्वातंत्र्य दिले जावे.

➤ त्रिमंत्री योजना (16 मे 1946)
👉सर्व पक्षाचे हंगामी सरकार स्थापन करण्यात यावे.

➤ माउंटबॅटन योजना (3 जून 1947)
👉वायव्य सरहद्द प्रांतात सार्वमत घेण्यात यावे.


✍ माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
━━━━━━━━━━

Читать полностью…

MPSC History

🟢 इतिहास अभ्यासक्रम व Strategy
✍🏻 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे

By : Prof. Sachin Gulig

🗓 दिनांक:- 24 जानेवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.

🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.

लिंक
https://youtu.be/45R6MKv0tps
https://youtu.be/45R6MKv0tps
========
🎯 Like, Share & Subscribe

Читать полностью…

MPSC History

संस्था , संघटना व सभासद

जॉईन करा @MPSChistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास - समाजसुधारक - जन्म मृत्यू

Читать полностью…

MPSC History

इतिहास - समाजसुधारक - जन्म मृत्यू

Читать полностью…

MPSC History

इतिहास - महात्मा फुले ग्रंथसंपदा

जॉईन करा @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून ?"
पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते.. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज काय बी करा पण आम्हालाबी ब्राह्मण करा."

गाडगे महाराज यांच्यावरील पुस्तके :
The Wandering Saint (वसंत शिरवाडकर) - श्री गाडगे बाबा प्रकाशन समिती, मुंबई
आपले संत (एस.ए. कुलकर्णी) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९३)
कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे) -लोकवाड्मय गृह, मुंबई (१९९२)
गाडगेबाबा (वसंत पोतदार) -अक्षर प्रकाशन, मुंबई (१९९९)
गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी) - विजयश्री प्रकाशन, अमरावती (१९९३)
गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार) -योगेश प्रकाशन, पुणे (१९९३)
दिव्याला गाडगे महाराज (गो. भट) -नवलवय मुद्रणालय, अहमदाबाद (१९८२)
मानवता के पुजारी संत श्री गाडगे बाबा (स्यमंत सुधाकर) -गाडगेबाबा प्रकाशन समिती, मुंबई (१९९०)
मुलांचे गाडगेबाबा (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला कोल्हापूर (१९९२)
लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
लोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य (द.ता. भोसले) -ग्रंथाली, मुंबई (२००७)
श्री. संत गाडगे महाराज (मधुकर केचे) -साकेत प्रकाशन, औरंगाबाद (२००४)
श्री. संत गाडगे महाराज (गो.नी. दांडेकर) -मॅजेस्टिक, प्रकाशन मुंबई (१९९५)
श्री. संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पा.बा. कवडे) -अण्णासाहेब कोरपे चॉरिटेबल ट्रस्ट, अकोला (१९९४)
श्री. गाडगे महाराज गौरव ग्रंथ (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
श्री. गाडगे महाराज शेवटचे कीर्तन (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९५)
श्री. गाडगेबाबांचे विचार (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला, कोल्हापूर (१९९६)
श्री. गाडगेबाबांची पत्रे (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९१)
श्री. संत गाडगेबाबा विचार धन (ह.रा. हिवरे) -नारायणराव अमृतराव लभडे प्रकाशन (१९९९)
संत गाडगे महाराज (डॉ. श्याम दयार्णव कोपर्डेकर) - (१९९६)
संत गाडगे बाबांच्या आठवणी (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)

संकीर्ण :
डेबू हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.
देवकीनंदन गोपाळा हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.

पुरस्कार :
गाडगेबाबा यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान चालवले जाते. त्यांच्या नावाने काही पुरस्कारही देण्यात येतात.
१. महाराष्ट्र सरकारतर्फे गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार
२. पिंपरी शहर लॉन्ड्री संघटनेचे (अ) राष्ट्रसंत गाडगेबाबा सामाजिक जाणीव पुरस्कार.(ब) राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार.

Читать полностью…

MPSC History

गाडगे महाराज

गाडगे महाराज (जन्म: फेब्रुवारी २३, १८७६- मृत्यु: २० डिंसेंबर १९५६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

बालपण :
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते.
डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

सामाजिक सुधारणा :
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्‍यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

त्यांनी

Читать полностью…

MPSC History

https://youtu.be/xjGJZMcwMEs?si=tQzNOJv8_KNght7A

Читать полностью…

MPSC History

आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल...

लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा...

https://youtu.be/IBpsjK98C6g?si=RirGV3-6v36OGywg

Читать полностью…
Subscribe to a channel