mpsceconomics | Education

Telegram-канал mpsceconomics - MPSC Economics

113768

Here u can get all useful info about economics for competitive exams. Join us @MPSCEconomics

Subscribe to a channel

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

तलाठी पद भारती 2023

एकूण जागा - 4644

अर्ज करण्याची तारीख - 26 जून 2023 - 17 जुलै 2023

जॉईन - @jobkatta

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

🔹अग्रणी बँक योजना 🔹

14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांच्या शाखा विस्तारासाठी, विशेषत:ग्रामीण भागात, एका चांगल्या योजनेची गरज वाटू लागली. त्यादृष्टीने अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली.

*शिफारस -*

डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटा' ने राष्ट्रीयीकृत बँकांना 'क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण' लागू करण्याची शिफारस केली. (अर्थ : आपला शाखा विस्तार करीत असतांना राष्ट्रीयीकृत बँकांनी एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रीत करावे, त्या क्षेत्रात बँकिंगच्या सुविधांनी वाढ घडवून आणून त्या क्षेत्राचे पालन-संगोपन करून आर्थिक विकास घडवून आणावा.)1969 मध्ये या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री.एफ.के.एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली "बँक व्यावसायिकांची समिती" (Committee of Bankers) स्थापन करण्यात आली. नरिमन समितीने गाडगीळ यांचा "क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण" मान्य करून त्याला मूर्त स्वरूप दिले व "अग्रणी बँक योजना" तयार केली.

*सुरुवात -*

1969 च्या अखेरीला RBI ने योजना स्विकारली व तिची अंमलबजावणी देशातील 338 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली.

*योजना -*

देशातील 338 जिल्हे, SBI, तिच्या सहयोगी बँका, 14 राष्ट्रीयीकृत बँका व 3 खाजगी बँकांमध्ये वाटून देण्यात आले.मात्र, मुंबई, कलकत्ता, मद्रास ही महानगरे आणि दिल्ली, पोंडीचेरी व गोवा हे केंद्रशासित प्रदेश यांना ही योजना लागू करण्यात आली नाही.अशा रितीने एक जिल्हा एका बँकेला दत्तक म्हणून देण्यात आला. त्या बँकेला त्या जिल्ह्याची "अग्रणी बँक" म्हणून दर्जा देण्यात आला.असा दर्जा मिळाल्यानंतर त्या अग्रणी बँकेने त्या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रथम पुढाकार घ्यावा. तसेच,जिल्ह्याचे पतधोरण तयार करून संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी अग्रणी बँकेवर टाकण्यात आली.

*कार्ये -*

जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी अग्रणी बँकेने खालीलकार्ये करणे अपेक्षित होते -

जिल्ह्याचे सर्वेक्षण करून जिल्ह्याची पत गरज ठरविणे.बँक-शाखा कोठे सुरू करता येतील याचा शोध घेणे.जिल्हा सल्लामसलत समित्या (Dist.Consultative committees) ची स्थापना करून पुढीलप्रमाणे समन्वयाचे कार्य घडवून आणणे -
जिल्ह्यातील सर्व व्यापारी बँका, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांमध्ये समन्वय.
जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील बँकांमध्ये समन्वय.
अल्पकालीन व दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यामध्ये समन्वय.
जिल्ह्यातील विकास कार्यांमध्ये गुंतलेल्या सर्व संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय.1976 च्या उच्चाधिकारी समितीच्या शिफारसींनुसार अग्रणी बँकांवर 3 वर्षाचे जिल्हा पतधोरण (District Credit Plans) तयार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. हे धोरण सर्वसमावेशक स्वरूपाचे असून त्यात जिल्ह्यातील बँकांसाठी गटनिहाय, क्षेत्रनिहाय योजनानिहाय आणि बँकनिहाय कर्ज पुरवठ्याची लक्ष्ये ठरविली जातात.
भारत सरकारच्या सुचनेंतर्गत एप्रिल 1989 मध्ये अग्रणी बँक योजनेंतर्गत क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण लागू करण्यात आला.

*महाराष्ट्रातील अग्रणी बँका (33 जिल्हयांसाठी)*

स्टेट बँक ऑफ इंडिया - बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नंदुरबार.सेंट्रल बँक ऑफ इंडिया - अकोला, अमरावती, सांगली, धुळे, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, वाशीम, बुलढाणा.बँक ऑफ इंडिया - नागपूर, भंडारा, चंद्रपुर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया.बँक ऑफ महाराष्ट्र - औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे, जालना.

*सध्यस्थिती -*

सध्या फेब्रुवारी 2013 मध्ये अग्रणी बँक योजना देशातील 622 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यात उत्स्फृर्तपणे सहभागी आहेत.     फेब्रुवारी 2013 मध्ये SBI किंवा तिच्या सहयोगी बँका सर्वाधिक म्हणजे 204 जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक म्हणून कार्य करीत होती.

*उषा थोरात समिती -*

भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती. उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अग्रणी बँक योजनेच्या परीक्षणासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली होती. या समितीने 20 एप्रिल, 2009 रोजी आपला अहवाल सादर केला.
______________________________________
आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी @MPSCEconomics येथे क्लिक करा.

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

राष्ट्रीय लोकसंख्या आयोग 2000

स्थापना 11 मे, 2000

अध्यक्ष पंतप्रधान

सदस्य लोकसंख्या विशेषज्ञ अर्थतज्ञ समाजशास्त्रज्ञ

पहिली सभा दो 22 july 2000

उद्देश राष्ट्रीय लोकसंख्या धोरण याची कार्यप्रणाली सुनिश्चित करणे

राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची पुनर्स्थापना  पंतप्रधानांना द्वारे 19 मे, 2005 रोजी करण्यात आली यामध्ये उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची कार्यप्रणाली आरोग्य मंत्रालया मार्फत चालते

राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे सदस्य संख्या चाळीस एवढे निश्‍चित करण्यात आली आहे.


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Читать полностью…

MPSC Economics

पेमेंट बँक स्थापन कराव्या अशी शिफारस – नचिकेत मोर समितीने केली होती.

पेमेंट बँक चालू खाते उघडू शकणार , बचत खाते उघडता येणार मात्र , मुदत ठेवी ठेवता येणार नाही.
पेमेंट बँकेत जास्तीत जास्त 1 लाख रुपयांची ठेवी ठेवता येणार.
रिजर्व बँकेने ठरवल्या प्रमाणे CRR ठेवावा लागणार , तर SLR 75 % ठेवावा लागणार.
पेमेंट बँकांना 25% शाखा ग्रामीण भागात उभारणे अनिवार्य
सुरुवातीचे भाग भांडवल 100 कोटी असायला हवे.
क्रेडिट कार्ड , कर्ज देता येणार नाही मात्र , Atm , डेबिट कार्ड तसेच Mutual Fund , विमा उत्पादने देता येतील.
व्यवहार शुल्काद्वारे मुख्य उत्पन्न

पेमेंट बँक स्थापना क्रम :--

1. Airtel payment Bank – राजस्थान

2. पोस्टल पेमेंट बँक

3. PAYTM पेमेंट बँक

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Читать полностью…

MPSC Economics

स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना (SJSRY):

भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण जयंतीच्या वर्षी 1 डिसेंबर 1997 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली. तीन योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना तयार करण्यात आली आहे.

नेहरू रोजगार योजना

अर्बन बेसिक सर्विस फॉर पुअर

प्राईम मिनिस्टर इंटिग्रटेड अर्बन प्रॉव्हर्टी    

ही योजना शहरी भागातील बेरोजगार तसेच अर्ध बेरोजगार यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करते. तसेच, योजनेत माजुरी रोजगाराचीही तरतूद करण्यात आली आहे.

लाभर्थ्यांची निवड शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत घरोघरी जाऊन केली जाते.

योजनेचा वित्तपुरवठा केंद्र व राज्य सरकारमध्ये 75:25 या प्रमाणात केला जातो.

या योजनेत पुढील दोन उप-योजना राबविल्या जातात

अर्बन सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम

अर्बन वेज एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Читать полностью…

MPSC Economics

स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना :

1 एप्रिल 1999 पासून पुढील सहा योजनांचे एकत्रिकरण करून ही योजना सुरू करण्यात आली.

एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम

स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण

ग्रामीण क्षेत्रातील स्त्रीया व मुलांचा विकास

दशलक्ष विहीरींची योजना

गंगा कल्याण योजना ग्रामीण

ग्रामीण कारागीरांना सुधारित औजारांचा पुरवठा

❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

#Govt_Scheme

🔹सुकन्या समृद्धी योजना २०१६🔹

* १ हजार रुपयाच्या किमान रकमेसह सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडता येते.

* हे खाते मुलीच्या जन्मापासून केवळ १० वर्षापर्यंतच उघडता येते. एका वर्षामध्ये या खात्यात किमान हजार रुपये किंवा अधिकाधिक १.५० लाख जमा करता येतात.

* एक पालक आपल्या केवळ दोन मुलीकरता हे खाते उघडू शकतो, आणि दोघींच्या खात्यात एक वर्षात १.५० लाख यापेक्षा अधिक रक्कम भरता येणार नाही.

* मात्र दुसऱ्यांदा जुळ्या मुली झाल्यास तिसऱ्या मुलीकरता हे खाते उघडले जाऊ शकते. मुलगी २१ वर्षे झाल्यावर हे खाते परिपक्व होते.

* तथापी १८ वर्षानंतर आवशक्यता असल्यास ५०% रक्कम काढता येईल, ही योजना मुलीच्या शिक्षणाचा खर्च आणि लग्नाचा खर्च घेऊन तयार करण्यात आली.

* या योजनेसाठी मुलीचे खाते काढताना मुलीचा जन्माचा दाखला, ओळखपत्र, निवासी पत्र, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

* खात्याच्या परिपक्वतेनंतर जमा झालेली रक्कम संबंधित मुलीच्या मालकीची होते. भारतात हे खाते कुठेही काढता येते.

* वयाच्या १० वर्षानंतर मुलगी स्वतः आपले खाते हाताळू शकते. किमान एक हजार रुपये दरवर्षी न भरू शकल्यास त्या वर्षासाठी ५० रुपये दंड आकाराला जाईल, मात्र दंडाच्या रकमेसह १४ वर्षापर्यंत कधीही हे खाते पुन्हा सुरु करण्याची तरतूद आहे.
______________________________________
आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण

राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची घोषणा 15 फेब्रुवारी 2000रोजी डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ कार्य दलाच्या शिफारसी करण्यात आली

उद्देश दोन मुले “हम दो, हमारे दो” या तत्त्वाचा पुरस्कार करणे कारण 2043 पर्यंत लोकसंख्या स्थिर करण्यात येईल.

धोरणाची लक्षणे 2040 पर्यंत अस्थिर लोकसंख्येचे लक्ष प्राप्त करण्यासाठी खालील लक्षणांचा उल्लेख केला जातो

शिशु मृत्यु दर 30 प्रति हजार 1000 पेक्षा कमी आणणे

मातामृत्यू दर 100000 माता मागे 100 पेक्षा कमी करणे

दोन मुलांच्या छोट्या कुटुंबात प्रोत्साहन देणे

सुरक्षित गर्भपात सुविधांमध्ये वाढ करणे एड्स माहिती उपलब्ध करणे मुलींचे लग्न 18 वर्षाच्या आत होऊ न देता ते वीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर करण्यास मान्यता देणे 80% प्रसूतीसाठी प्रशिक्षित स्टाफ चा उपयोग करणे.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Читать полностью…

MPSC Economics

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना :

ही योजना 25 डिसेंबर 2005 पासून 100 टक्के केंद्र-पुरस्कत म्हणून सुरू करण्यात आली.

सर्व न जोडलेल्या खेडे गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे.

निधी पुरवठा; केंद्रीय रस्ते निधीमध्ये जमा झालेल्या हाय स्पीड डिझेल वरील उपकराच्या 50% रक्कम या योजनेसाठी वापरली जाते.त्याचबरोबर देशी तसेच परदेशी बहुराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदतही यासाठी घेतली जाते.

या योजनेचे उद्दिष्ट सपाट प्रदेशातील 500 पेक्षा अधिक लोकवस्तीच्या तर डोंगराळ/ आदिवासी/ वाळवंटी/ डाव्या अतिरेकाने प्रभावी प्रदेशातील 250 पेक्षा अधिक लोकवस्तीच्या वस्त्यांना

सिंगल बारमाही रस्त्याने जोडणे, हे आहे. या योजनेत आतापर्यंत रस्त्यांनी न जोडण्यात आलेल्या वस्त्यांचाच समावेश करण्यात आला आहे.

आतापर्यंत 3,41,257 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले असून 82,019 वस्त्यांना नवीन रस्त्यांनी जोडण्यात आले आहे.

🍀🌹🍀🌹🍀🌹🍀🌹🍀🌹🍀

Читать полностью…

MPSC Economics

इंदिरा आवास योजना (IAY):

1985-86 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. एप्रिल 1989 पासून तिची अंमलबजावणी जवाहरलाल रोजगार योजनेचा भाग म्हणून करण्यास सुरुवात झाली. 1 जानेवारी 1966पासून

भारत सरकारने तिला स्वातंत्र्य दर्जा दिला आहे.

या योजेनेअतर्गत अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व मुक्त वेठबिगर या गटांतील दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण कुटुंबीयांना घरे बांधण्यासाठी/सुधारण्यासाठी वित्तीय सहाय्य दिले जाते.

ही केंद्र पुरस्कार योजना असून वित्तीय संसाधनांची विभागणी केंद्र व राज्यांमध्ये 75:25 प्रमाणात केली जाते.पूर्वात्तर राज्यांसाठी हे प्रमाण 90:10 असे आहे.

टिकाऊ पदार्थाची घरे बांधण्यासाठी केंद्र शासनाने एप्रिल 2010 पासून प्रत्येक घराची किमत प्रत्येकी रु. 45000 इतकी निश्चित केली आहे. राज्य शासनाने ही किंमत प्रत्येकी रु. 70,000 एवढी सुधारित केली आहे.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Читать полностью…

MPSC Economics

स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना (SJSRY):

भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण जयंतीच्या वर्षी 1 डिसेंबर 1997 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली. तीन योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना तयार करण्यात आली आहे.

नेहरू रोजगार योजना

अर्बन बेसिक सर्विस फॉर पुअर

प्राईम मिनिस्टर इंटिग्रटेड अर्बन प्रॉव्हर्टी    

ही योजना शहरी भागातील बेरोजगार तसेच अर्ध बेरोजगार यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करते. तसेच, योजनेत माजुरी रोजगाराचीही तरतूद करण्यात आली आहे.

लाभर्थ्यांची निवड शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत घरोघरी जाऊन केली जाते.

योजनेचा वित्तपुरवठा केंद्र व राज्य सरकारमध्ये 75:25 या प्रमाणात केला जातो.

या योजनेत पुढील दोन उप-योजना राबविल्या जातात

अर्बन सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम

अर्बन वेज एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Читать полностью…
Subscribe to a channel