221198
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi
अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव
अन्न = आहार, खाद्य
अग्नी = आग
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा
अश्रू = आसू
अंबर = वस्त्र
अमृत = पीयूष
अहंकार = गर्व
अंक = आकडा
आई = माता, माय, जननी, माउली
आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर
आठवण = स्मरण, स्मृती, सय
आठवडा = सप्ताह
आनंद = हर्ष
आजारी = पीडित, रोगी
आयुष्य = जीवन, हयात
आतुरता = उत्सुकता
आरोपी = गुन्हेगार, अपराधी
आश्चर्य = नवल, अचंबा
आसन = बैठक
आदर = मान
आवाज = ध्वनी, रव
आज्ञा = आदेश, हुकूम
आपुलकी = जवळीकता
आपत्ती = संकट
आरसा = दर्पण
आरंभ = सुरवात
आशा = इच्छा
आस = मनीषा
आसक्ती = लोभ
आशीर्वाद = शुभचिंतन
इलाज = उपाय
इशारा = सूचना
इंद्र = सुरेंद्र
इहलोक = मृत्युलोक
ईर्षा = चुरस
उत्सव = समारंभ, सण, सोहळा
उक्ती = वचन
उशीर = विलंब
उणीव = कमतरता
उपवन = बगीचा
उदर = पोट
उदास = खिन्न
उत्कर्ष = भरभराट
उपद्रव = त्रास
उपेक्षा = हेळसांड
ऊर्जा = शक्ती
ॠण = कर्ज
ॠतू = मोसम
एकजूट = एकी, ऐक्य
ऐश्वर्य = वैभव
ऐट = रुबाब, डौल
ओझे = वजन, भार
ओढा = झरा, नाला
ओळख = परिचय
औक्षण = ओवाळणे
अंत = शेवट
अंग = शरीर
अंघोळ = स्नान
अंधार = काळोख, तिमिर
अंगण = आवार
अंगार = निखारा
अंतरिक्ष = अवकाश
कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत
कठीण = अवघड
कविता = काव्य, पद्य
करमणूक = मनोरंजन
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज
कपाळ = ललाट
कष्ट = श्रम, मेहनत
कंजूष = कृपण
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी
कान = श्रवण
कावळा = काक
काष्ठ = लाकूड
किल्ला = गड, दुर्ग
किमया = जादू
कार्य = काम
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज
कुत्रा = श्वान
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट
खण = कप्पा
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम
खोड्या = चेष्टा, मस्करी
गरज = आवश्यकता
गवत = तृण
गर्व = अहंकार
गाय = धेनू, गोमाता
गाणे = गीत, गान
गंमत = मौज, मजा
गंध = वास, दरवळ
ग्रंथ = पुस्तक
गाव = ग्राम, खेडे
गुन्हा = अपराध
गुलामी = दास्य
गोड = मधुर
गोणी = पोते
गोष्ट = कहाणी, कथा
गौरव = सन्मान
ग्राहक = गिऱ्हाईक
घर = सदन, गृह, निकेतन, आलय
घरटे = खोपा
घागर = घडा, मडके
घोडा = अश्व, हय, वारू
________________________________________
आमचे मराठी व्याकरण चॅनेल जॉईन करण्यासाठी @marathi येथे क्लिक करा , ग्रुप ओपन झाल्यावर , join वर क्लिक करा.
________________________________________
Telegram.me/marathi
आपल्या भाषेचे शुद्धीकरण करून त्या रूपाने इंग्रजीची ह्कालपट्टी करू शकतो अशी सावरकरांच्या अनुयायांची श्रद्धा होती.
अरबी-फारसी आणि इंग्रजी शब्दांच्या ऐवजी मराठी आणि संस्कृत शब्दप्रयोग करावेत असे विनायक दामोदर सावरकर व त्यांच्या अनुयायांचे मत होते. ही सावरकरांची भूमिका माधवराव पटवर्धनांनी थोड्या फरकाने म्हणजे शक्य तिथे संस्कृतसुद्धा टाळावे व मराठी शब्द वापरावे अशा स्वरूपात मांडली(जळगाव साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण १९३६).
भाषाशुद्धी भूमिकेच्या मर्यादासुद्धा विविध व्यक्तींनी व्यक्त केल्या तर काहींनी टीकाही केली. १९२७च्या पुणे साहित्य संमेलनात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी भूमिका अशी घेतली की कोणतीही भाषा अन्य भाषासंपर्कापासून अलिप्त राहू शकत नाही. दीर्घकाळ एकमेकींच्या सहवासात आदान-प्रदान होणे ही स्वाभाविक क्रिया आहे. जे शब्द मराठीशी एकरूप झाले आहेत ते केवळ अन्य भाषांतून आले या कारणासाठी त्यांना बहिष्कृत करणे अव्यवहार्य आहे. मराठीत हवा, जमीन, वकील गरीब, सराफ, महाल, इलाखा, जिल्हा, मुलूख, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, मुद्दा ,अत्तर, तवा ,तपशील, सरबत असे शेकडो अरबी-फारसी शब्द आले आहेत व ते मराठीचा एक भाग झाले आहेत. त्यांना मराठीतून काढून टाकणे अशक्य आहे.
प्राध्यापक श्री.के. क्षीरसागर यांचा विरोध अधिक तीव्र होता."खरी भाषाशुद्धी आणि तिचे खरे वैरी सावरकर आणि पटवर्धन" हा क्षीरसागरांचा आक्रमक शैलीतील लेख त्या वेळच्या सह्याद्री मासिकात प्रकाशित झाला, त्यामुळे बरीच खळबळ निर्माण झाली. 'सह्याद्री' आणि 'लोकशिक्षण' या त्यावेळच्या मासिकांमधून भाषाशुद्धीबद्दलची मतमतांतरे मांडणारे अनेक लेख प्रकाशित झाले.
प्रा. क्षीरसागरांच्या मते भाषाशुद्धिवाद्यांना क्लिष्ट आणि विकृत शब्द निर्मितीचा रोग जडला आहे. भाषाशुद्धीचे कारण पुढे करून हल्ली जो उठतो तो नवे शब्द बनवत सुटला आहे. यामुळे मराठीचे स्वाभाविक सौंदर्य बिघडत असून फारसी आणि इंग्रजी शब्दांचे उच्चाटन व्हायच्या ऐवजी त्यांची आठवण पक्की होत आहे.
गोल्डन मीन साठी 'सुवर्णमध्य' 'क्रोकोडाइल टियर्स' साठी 'नक्राश्रू'; 'रेकॉर्ड ब्रेक' ला 'उच्चांक मोडणे' हे किंवा असले शब्द म्हणजे शब्दाला शब्द ठेवून केलेली भाषांतरे होत. या भाषांतरित शब्दांमुळे मूळ इंग्रजी शब्दच कृत्रिम रूपाने मराठीत येत आहेत. सर्वसामान्य मराठी माणसालाही कोणता शब्द कोठे वापरावयाचा ते स्वभावतःच कळते. 'कमाल' शब्द त्याज्य आणि 'पराकाष्ठा' तेवढा स्वीकार्ह असे तो मानणार नाही.तर 'प्रयत्नांची पराकाष्ठा' आणि 'मूर्खपणाची कमाल' असा योग्य वापर तो करील.
परभाषांमुळे अधिक पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे सूक्ष्म अर्थच्छटा व्यक्त करायला त्यांचा उपयोग होतो हे मत गो.कृ. मोडक यांनीही मांडले आहे. अर्भक, संतान, संतती, मूल, बालक हे सगळे स्वकीय शब्द आहेत. पण कोणता शब्द कोठे वापरावयाचा याचे संकेत वेगळे आहेत. यात औलाद या परकीय शब्दामुळे आणखी भर पडली आहे. सह्याद्री मासिकासाठी एका विस्तृत लेखाद्वारा न.चिं. केळकरांनी भाषाशुद्धीचे स्वागत करूनही तिच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. त्यांच्या पद्धतीने युक्तिवाद करताना त्यांनी म्हटले आहे, 'तत्त्वात जिंकाल पण तपशिलात हराल'.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 'भाषाशुद्धी' या प्रश्नाची 'चळवळ' होण्यासारखी स्थिती उरली नसली तरी अनेक भाषिक प्रश्नांची गुंतागुंत वाढली आहे असे दिसून येते.
जॉईन करा @Marathi
★|| मराठी व्याकरण ||★
🍀📝 शब्दशोध 📝🍀
〰〰〰〰〰〰〰〰〰
खालील शब्दांचे किंवा शब्दसमूहाचे अर्थ सांगा.उत्तर केवळ चार अक्षरी शब्द हवा व प्रत्येक शब्दात शेवटचे दोन अक्षरे
🔹दा र 🔹 असली पाहिजेत.
😊😊 चला प्रयत्न करू या
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
१) घोडा सांभाळणारा -मोतदार
२) वेत्रधारी- चोपदार
३) ऑफिसर- कामदार
४) रूचकर - चवदार
५) सुंदर - छबीदार
६) चांगल्या घाटाचा -डौलदार
७) उतरती - ढाळदार
८) मोतद्दार -खासदार
९) सोयरा - नातेदार
१०) शोभिवंत - टुमदार
११) तेजस्वी - पाणीदार
१२) छत्रधर -माहीदार
१३) गच्च भरलेले - भरदार
१४) प्रांतावरचा मुख्य अधिकारी - सुभेदार
१५) अधिन -ताबेदार
___________________________
आमचे मराठी व्याकरण चॅनेल जॉईन होण्यासाठी येथे क्लीक करा telegram.me/Marathi
🔹समूहवाचक शब्द
५) समूहवाचक शब्द :-
१) खेळाडूंचा - संघ
२) भाकऱ्यांची - चवड
३) तारकांचा - पुंज
४) फळांचा - घोस
५) पक्ष्यांचा - थवा
६) प्राण्यांचा - जथा
७) मुलांचा, मुलींचा - घोकळा
८) हत्तींचा - कळप
९) दुर्वांची - जुडी
१०) किल्ल्यांचा - जुडगा
🔹विरुद्धार्थी शब्द
३) विरुद्धार्थी शब्द :-
१) इहलोक x परलोक
२) तेजी x मंदी
३) पुरोगामी x प्रतिगामी
४) श्रेष्ठ x कनिष्ठ
५) स्वच्छ x घाणेरडा
६) सुटका x अटक
७) सुभाषित x कुभाषित
८) हिरमुसलेला x उत्साही
९) स्वार्थ x परमार्थ
१०) विलंब x त्वरा
🔹शब्दसमूहाबद्दल एक शब्द :-
१) जे विसरता येणार नाही असे - अविस्मरणीय
२) परमेश्वराचे अस्तित्व मानणारा - आस्तिक
३) जाणून घेण्याची इच्छा असलेला - जिज्ञासू
४) सतत उद्योग करणारा - दीर्घोद्योगी
५) दुसऱ्याच्या जिवावर जगणारे - परोपजीवी
६) गावाचा कारभार - गावगाडा
७) वाजवीपेक्षा जास्त खर्च करणारा - उधळ्या
८) तीन रस्ते मिळतात ती जागा - तिठा
९) मोफत पाणी मिळण्याची व्यवस्था - पाणपोई
१०) घोड्यांना बांधण्याची जागा - पागा
"ल" आणि "ळ" ही दोन स्वतंत्र अक्षरे.
या दोन अक्षरांचे उच्चार जवळपास पूर्ण मिळते जुळते.
त्यामुळे अनेकदा "ळ" चा उच्चार काही लोक सहजपणे "ल" सारखा पण "ल" नाही, "ल" व "ळ" च्या मधला करतात. तर काही वेळेस "ल" करतात.
"ल" हा उच्चार जगातील सर्व भाषांमधे आहे.
पण "ळ" हा उच्चार भारताबाहेर फक्त नेपाळमधे आहे, बाकी जगात कोठेही नाही.
भारतातदेखील "ळ" हा उच्चार सर्वत्र नाही.
संस्कृत मधे सध्या "ळ" नाही.
हिंदी, बंगाली, आसामी मधे "ळ" नाही.
सिंधी, गुजराती मधे "ळ" आहे,पण माझ्या अंदाजानुसार फारसा वापरात नाही.
मराठी व दक्षिण भारतातील सर्व भाषात "ळ" आहे व वापर भरपूर आहे.
"ल" व "ळ" च्या उच्चारातील सारखेपणा मुळे "ळ" च्या ऐवजी "ल" बोलले लिहिले तर कुठे बिघडते असे अनेकांना वाटत असेल कदाचित.
हिंदीत कमल व मराठीत कमळ
"ल" काय, "ळ" काय..
काय फरक पडला?
पण कसे मराठीत होत नाही. "ल" की "ळ" यावरून अर्थात फरक पडतो.
T.me/marathi
काही शब्द पाहू.
अंमल - राजवट
अंमळ - थोडा वेळ
वेळ time
वेल- झाड, सायलीचा वेल वगैरे
खल- गुप्त चर्चा किंवा
खल बत्ता मधील खल
खळ- गोंद
पाळ - कानाची पाळ
पाल -. सरडा, पाल वगैरे
नाल.- घोड्याच्या, बैलांच्या खुरांना मारतात ती धातूची पट्टी
नाळ - बाळ आईच्या पोटात असताना अन्न पुरवठा वगैरे करणारा बेंबीशी संबंधीत अवयव
कल - निवडणूकीचा कल, झुकाव
कळ - वेदना,पोटातील कळ किंवा यंत्राचे बटण
लाल - लाल रंग
लाळ - थुंकी
ओल - पावसात भिंतीला येणारा ओलसरपणा
ओळ - रेघ
मल - शौच
मळ - कानातला, त्वचेचा मळ
माल - सामान
माळ - मण्यांची माळ, हार
चाल - चालण्याची ढब....त्याची चाल ऐटदार आहे वगैरे
चाळ - नर्तकीच्या पायातील घुंगरांचा दागिना
दल.- राजकीय पक्ष, संघटना--जनता दल, पुरोगामी लोकशाही दल
दळ - भाजी अथवा फळाचा गर, वांग्याचे दळ वगैरे
छल.- कपट
छळ - त्रास
काल - yesterday
काळ - कालखंड वगैरे, मृत्यु
गलका - ओरडा आरडा
गळका - पाण्याचा पाईप लिकेज असणे वगैरे
खाली म्हणजे वरतीच्या विरुद्ध under, down,
हिंदीत खाली म्हणजे रिकामे
मराठीत गाडी रिकामी होते........खाली होत नाही.
तरी आपली भाषा जपा इंग्रजी, हिंदीचे आक्रमण रोखा.
इंग्रजी, हिंदीच्या नादी लागून थाळीला थाली म्हणू नका.
जॉईन करा @Marathi
"ळ" जपा.............मराठीचे सौंदर्य जपा....!!!
🔹सराव प्रश्नसंच
1. क्रियापदावरून फक्त काळाच बोध होत असेल म्हणजेच फक्त क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर अशा क्रियापदाला ........ क्रियापद असे म्हणतात.
स्वार्थ
आज्ञार्थ
विध्यर्थ
संकेतार्थ
उत्तर : स्वार्थ
2. वाक्याचा काळ ओळखा - 'मी नदीकाठी खेळत असतो'
साधा भूतकाळ
अपूर्ण भूतकाळ
पूर्ण भूतकाळ
रिती भूतकाळ
उत्तर : पूर्ण भूतकाळ
3. विधर्थी क्रियापदावरून कोणता आख्यातविकार ओळकता येतो?
ऊ-आख्यात
ई-लाख्यात
लाख्यात
वाख्यात
उत्तर : ऊ-आख्यात
4. 'चमचम' - हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?
गतिदर्शक
अनुकरणदर्शक
निश्चयदर्शक
प्रकारदर्शक
उत्तर : गतिदर्शक
5. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणार्या अविकारी शब्दाला ....... अव्यय असे म्हणतात.
शब्दयोगी
उभयान्वयी
केवलप्रयोगी
शब्दसिद्धी
उत्तर : केवलप्रयोगी
6. कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात ....... असे म्हणतात.
क्रिया विशेषण
प्रयोग
अव्यय
आख्यात विकार
उत्तर : अव्यय
7. ज्या तत्पुरुषात पूर्वपदाच्या सप्तमीच्या 'ई' विभक्ती प्रत्याचा लोप होत नाही, त्यास ....... तत्पुरुष असे म्हणतात.
अलुक
उपपद
कृदत
नत्र
उत्तर : कृदत
8. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा ...... हा अलंकार होतो.
पर्यायोक्ती
सार
अन्योक्ती
भ्रांतिमान
उत्तर : भ्रांतिमान
9. अक्षरगण वृत्ताचे प्रकार ओळखा - अक्षरे - 12, गण - य,य,य,य.
1
1
1
1
उत्तर : 1
10. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
आशिर्वाद
आकृती
विहीर
अंतर्मुख
उत्तर : आकृती
-----------–--------------------------
मराठी व्याकरण विषयक अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे @marathi चॅनेल.
Telegram.me/marathi
2026 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी GS ची Strategy Lecture Series
1) Strategy: प्रा.श्याम सर
https://youtu.be/Xt7XQL9dBvk
2) भूगोल: प्रा. तुपे सर
https://youtu.be/g0Bu3qY3jmk
3) राज्यशास्त्र: प्रा. सागर सर
https://youtu.be/hixil3vjKTk
4) विज्ञान : ऋतुजा मॅडम
https://youtu.be/xjGJZMcwMEs
5) इतिहास: सचिन गुळीग
https://youtu.be/45R6MKv0tps
🔹मराठी भाषेच्या इतिहासा -
मराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने
मराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने ग्रांथिक साधने,कोरीव लेख-शिलालेख,ताम्रपट;लोकसाहित्य, अप्रत्यक्ष साधने
प्रमाण साधने कागदपत्रांचा आधार शासकीय आदेश, राजाने काढलेली फर्माने आज्ञापत्रे, करारनामे, तहनामे आपापसातील पत्रव्यवहार दुय्यम साधने तवारिखा,बखरी,पोवाडे,स्रोत्रे
ऐतिहासिक उत्पत्ती
वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषेच्या स्वरुपावरुन प्रत्येक भाषेतील काही वैशिष्टे मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असा विचार अनेक अभ्यासक मांडतात मात्र त्यांच्यात एकमत अजूनही दिसून येत नाही.
मराठी भाषेच्या बाबतीत काही मते अशी-
वेदकालीन
वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरुन मराठीचा जन्म झाला. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. आणि इतर प्राकृत भाषेच्या रुपाशी जुळणारे विशेष सापडतात. पण एवढ्यावरुन अभ्यासक तिला प्राकृत पासुन निर्माण झाली असे मानण्यास तयार नाहीत. वेदकाळापासून इ.स.५०० - ७०० पर्यंत वेदकालीन प्राकृत भाषा समाजात वापरात नव्हत्या त्यामुळे हे मत योग्य वाटत नाही.
वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरुन मराठीचा जन्म झाला. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. म्हणजे वेदपुर्वकालीन भाषेत साधे स्वर, संयुक्त स्वर, आणि अर्धस्वर दिसतात. तिन्हीपैकी उच्चारदृष्ट्या अर्धस्वर हे प्रथमचे असावेत. अर्धस्वरापासून साधे स्वर निर्माण झाले आणि शेवटी संयुक्त स्वर असा क्रम आहे. तो संस्कृत मधे नाही, असे म्हणतात. आणि अभिजात संस्कृत हे व्याकरण, छंद,मात्रा, गण, यामुळे ते परिपूर्ण होते. वेदात वेदपुर्वीचे शब्द आहेत पण ते अभिजात संस्कृत मधे नाहीत त्या पुर्वीच्या भाषेचा प्राकृत आणि मराठी भाषेशी संबध दाखवण्याचा प्रयत्न या विषयाचे अभ्यासक करतात.
तमिळ-मराठी भाषा संबंध
मराठी भाषेचा ज्ञात इतिहास साधारणपणे हजार ते तेराशे वर्षांचा आहे. कन्नड आणि तेलुगू भाषा आणखी पाचशे वर्ष वरिष्ठ आहेत असे मानले जाते. मराठीच्या अगोदर प्राकृत-अपभ्रंश आणि महाराष्ट्री प्राकृत ह्यांचा वावर सुमारे १५०० वर्षे होता असे मानले तरी त्यापूर्वी महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जायची हा प्रश्न उरतोच. मराठी भाषेत त्या काळात असणारे जे स्थानिक द्रविड कुलोत्पन्न शब्द होते, ते आजही वापरात आहेत, "देशी" अशा अर्थाने भाषातज्ज्ञ त्यांचा उल्लेख करतात. डॉ.पां.दा. गुणे व भाषाशास्त्रज्ञ विल्सन ह्याने मराठीतील देशी शब्दांचे ॠण मान्य केले आहे. अनुलोम-प्रतिलोम पद्धतीने प्रत्येक मराठी शब्दाचा संबंध संस्कृतशी जोडणे तार्किक वाटत नाही, त्यामुळे भाषेचे जाणकार श्री.केतकर ह्यांचे मत संस्कृत देखील स्थानिक भाषांपासून तयार झाली असावी असे आहे, जे आत्यंतिक स्वरूपाचे वाटते.
भाषातज्ज्ञ विश्वनाथ श्री. खैरे ह्यांनी "संमत" सिद्धान्ताद्वारे मराठीचे मूळ तमिळ भाषेमध्ये शोधले असल्याचे त्यांनी द्रविड महाराष्ट्र, अडगुलं मडगुलं (पुस्तक) या पुस्तकांत सांगितले आहे. डॉ. श्री.ल. कर्वे ह्यांचेही मत तसेच आहे. तमिळ आणि जुनी मराठी (साधारणपणे सातशे ते आठशे वर्षापूर्वीची- संत ज्ञानेश्वरांच्या काळातील) ह्यांचे पदक्रम, व्याकरण, वाक्यरचना ह्यांत खूपच साम्य आहे. वापरात असलेले मराठी शब्द थोड्याफार फरकाने आजही तमिळमध्ये दिसून येतात. त्यामुळे फक्त संस्कृत आणि प्राकृत ह्याच भाषांच्या आरोपणांतून मराठीचा जन्म झाला हा तर्क योग्य वाटत नाही. तर त्या उलट खैरे ह्यांचा
संमत सिद्धान्त अधिक स्वीकारार्ह वाटतो. (संमत=संस्कृत-मराठी-तमिळ).
संस्कृतपासून मराठी
संस्कृतपासून मराठी भाषा निर्माण झाली असे एक मत आहे. संस्कृतपासून मराठी निर्माण झाली नाही कारण वर्णांने बदल, प्रयोगातील वेगळेपणा, उच्चारणातील फरक, वाक्प्रचार, इत्यादी बाबतीत दोन्हीही भाषेत खूप वेगळेपणा आहे. जे थोडेफार साम्य आहे ते पुरेसे नाही.
भाषाशुद्धी चळवळ
स्वातंत्र्यवीर सावरकर १९२३पासून १९३७पर्यंत रत्नागिरीला स्थानबद्ध होते. प्रत्यक्ष राजकारणात भाग घ्यायला त्यांना बंदी होती. तेव्हा त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी यांवर टीका करणारे पुष्कळ लेख 'किर्लोस्कर' मासिकातून लिहिले. १९२४मध्ये 'केसरीत' 'मराठी भाषेचे शुद्धीकरण' ही लेखमाला लिहिली. याच शीर्षकाची पुस्तिका नंतर प्रकाशित झाली.
ही लेखमाला सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असताना लिहिली असल्यामुळे आणि सावरकरांबद्दल सुशिक्षित समाजास आदर आणि कुतूहल वाटत असल्यामुळे त्यांच्या सांगण्याचा अनेकांवर प्रभाव पडला. भाषाशुद्धी करणे हे राष्ट्रकार्यच आहे. त्यामुळे आपण जरी राजकारणात भाग घेऊन इंग्रजी राजवटीचा प्रतिकार करू शकलो नाही तरी सावरकर सुचवितात त्याप्रमाणे
🔹संधी व त्याचे प्रकार
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास 'जोडाक्षर' म्हणतात.
उदा.
विधालय : धा : द + य + आ
पश्चिम : श्चि : श + च + इ
आम्ही : म्ही : म + ह + ई
शत्रू : त्रू : त + र + ऊ
संधी:
स्वरसंधी -
जोडशब्द्ध तयार करतांना पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण व दुसर्या शब्दातील पहिले वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात.
उदा.
ईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा
सूर्यास्त = सूर्य + अस्त
सज्जन = सत् + जन
चिदानंद = चित् + आनंद
संधीचे प्रकार:
संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत.
स्वर संधी -
एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना 'स्वरसंधी' असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात.
दिर्घत्व संधी -
अ + अ = आ
आ + आ = आ
आ + अ = आ
इ + ई = ई
ई + ई = ई
इ + इ = ई
उ + ऊ = ऊ
उ + उ = ऊ
नियम -
(1) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे इ+ई आल्यास त्या दोघांऐवजी 'ए' येतो आणि 'उ' किंवा 'ऊ' आल्यास 'ओ' येतो व ऋण आल्यास 'र' येतो.
उदा.
ईश्र्वर+ईच्छा (अ+इ=ए) ईश्र्वर+ए+च्छा=ईश्र्वरेच्छा
गण+ईश (अ+इ=ए) गण+ए+श=गणेश
उमा+ईश (आ+इ=ए) उम+ए+श=उमेश
चंद्र+उदय (अ+उ=ओ) चंद्र+ओ+दय=चंद्रोदय
महा+ऋर्षी (आ+ऋ=अर) महा+अर+र्षी=महर्षी
देव+ऋर्षी (अ+ऋ=अर) देव+अर+र्षी=देवर्षी
(2) अ/आ यांच्यापुढे 'ए/ऐ' हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल 'ऐ' येतो आणि 'अ' किंवा 'अ' किंवा 'आ' या स्वरापुढे 'ओ/औ' स्वर आल्यास त्याबद्दल 'आ' येतो.
उदा.
एक+एक्य (अ+ए+=ऐ) एक+ऐ+अ= एकैक्य
सदा+ऐव (आ+ऐ=ऐ) सदा+ ऐ+व= सदैव
मत+एक्य (अ+ऐ=ऐ) मत+ऐ+क्य= मतैक्य
प्रजा+ऐक्य (आ+ऐ=ऐ) प्रज+ऐ+क्य= प्रजैक्य
जल+औघ (अ+ओ=औ) जल+औ+घ= जलौघ
गंगा+औघ (आ+औ=औ) गंगा+औ+घ= गंगौघ
(3) इ.उ,ऋ (र्हवस्व/दीर्घ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास 'इ/ई' बद्दल 'य' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'उ/ऊ' बद्दल 'व' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'ऋ' बद्दल 'र' हा मिसळून संधी होते.
उदा.
प्रीती+अर्थ (ई+अ+र्थ) प्रीत्यर्थ
इति+आदी (इ+आ+दी) इत्यादी
अति+उत्तम (इ+उ+त्तम) अत्युतम
प्रति+एक (इ+ए+क) प्रत्येक
मनू+अंतर (उ+अ+तर) मन्वंतर
पितृ+आज्ञ (ऋ+आ+ज्ञा) पित्राज्ञा
(4) ए,ऐ,ओ,औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय,आय,अवी.आवि असे आदेश होवून पुढील त्यात मिसळतो.
उदा.
ने+अन (ए+अ=अय) न+अय+न = नयन
गै+अन (ऐ+अ=आय) ग+आय+न = गायन
गो+ईश्र्वर (ओ+ई=अवी) ग+अवी+श्वर = गवीश्र्वर
नौ+इक ( औ+इ=आवि) न+आवि+क = नाविक
व्यंजन संधी :
एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन किंवा स्वर यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला 'व्यंजनसंधी' म्हणतात.
उदा.
सत्+जन = सज्जन (व्यंजन + व्यंजन = व्यंजन संधी)
चित्+आनंद = चिदानंद (व्यंजन + स्वर = व्यंजन संधी)
नियम -
(1) पहिल्या 5 वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापूढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. यालाच 'प्रथम व्यंजन संधी' असे म्हणतात.
उदा.
विपद्+काल = द्+क= त्क = विपत्काल
वाग्+पति = ग्+प= क्प = वाक्पती
क्षुध्+पिपासा= ध्+प्= त्+प्= त्प = क्षुत्पिपासा
(2) पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापूढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदु व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते त्याला *'तृतीय व्यंजन संधी'* असे म्हणतात.
🔹आलंकारिक शब्दयोजना
६) आलंकारिक शब्दयोजना :-
१) अतिशय बुद्धिमान व्यक्ती - ब्रह्मदेव
२) अप्राप्य गोष्ट - मृगजळ
३) अत्यंत रागीट माणूस - जमदग्नी
४) अत्यंत कुरूप स्त्री - कुब्जा
५) वेडेवाकडे बोलणे - मुक्ताफळे
६) तात्पुरती विरक्ती - स्मशानवैराग्य
७) कलहप्रिय स्त्री - कैकेयी
८) एकत्र येऊन कारस्थान करणारे लोक - चांडाळचौकडी
९) नेहमी सत्य बोलणारा धर्मनिष्ठ माणूस - धर्मराज
१०) गुणकारी उपाय - रामबाण
🔹शब्द एक - अर्थ अनेक
४) शब्द एक - अर्थ अनेक :-
१) पक्ष - पंख, बाजू, भाग, श्राद्ध
२) पूर - नगर, शहर, पाण्याचा पूर
३) वर - पती, आशीर्वाद
४) नाद - आवाज, छंद, आवड
५) वजन - माप, वचक, प्रतिष्ठा
६) खूण - चिन्ह, सूचना, इशारा, संकेत
७) काळ - वेळ, मृत्यू
८) मान - आदर, स्वाभिमान, शरीराचा एक अवयव
९) तीर - नदीचा काठ, बाण
१०) दल - सैन्याची तुकडी, फुलाची पाकळी
🔹समान अर्थाचे शब्द
२) समान अर्थाचे शब्द :- समानार्थी शब्द म्हणजे एका शब्दाशी समसमान अर्थव्याप्ती आणि वापराची व्याप्ती असलेला, त्याच भाषेतला दुसरा शब्द किंवा शब्दसमूह.
१) आनंद = हर्ष, मोद, संतोष
२) दिवस = वार, वासर, अहन
३) वारा = अनिल, पवन, वायू, समीरण
४) सोने = कनक, सुवर्ण, हेम, कांचन
५) मुलगा = पुत्र, सुत, नंदन, तनुज
६) पान = पर्ण, पत्र, पल्लव
७) नदी = सरीता, तटिनी, तरंगिणी
८) अनल = विस्तव, पावक, अग्नी, वन्ही
९) तोंड = आनन , मुख, वदन
१०) दैत्य = दानव, राक्षस, असुर
🟢 इतिहास अभ्यासक्रम व Strategy
✍🏻 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे
By : Prof. Sachin Gulig
🗓 दिनांक:- 24 जानेवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक
https://youtu.be/45R6MKv0tps
https://youtu.be/45R6MKv0tps
========
🎯 Like, Share & Subscribe
लक्षणा (लक्ष्यार्थ) :-
ज्या शब्दशक्तीमध्ये शब्दांचा मूळ अर्थ लक्षात न घेता, त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ घ्यावा लागतो. मनात शंका येते, हे कसे शक्य आहे तेव्हा ती शब्द लक्षणा असते.
उदा. आम्ही ज्वारी खातो. याचा अर्थ आम्ही ज्वारीपासून केलेले पदार्थ खातो. शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याला साजेसा जो दुसरा अर्थ घेतला जातो त्याला ‘लक्ष्यार्थ’ म्हणतात.
1) बाबा ताटावर बसले.
2) घरावरून हत्ती गेला.
3) आम्ही आजकाल ज्वारी खातो.
4) मी शेक्सपिअर वाचला.
5) सूर्य बुडाला.
6) पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या.
मराठी म्हणी भाग
@marathi
अगं अगं म्हशी मला कोठे नेशी -
स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.
आपला हात जगन्नाथ -
आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.
अति तेथे माती -
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.
आयत्या बिळात नागोबा -
दुसर्याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.
आईजीच्या जीवावर बाईजी उदार -
दुसर्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.
आपल्याच पोळीवर तूप ओढणे -
फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे.
आंधळे दळते कुत्रं पीठ खाते -
एकानं काम करावं आणि दुसर्यांनं त्याचा फायदा घ्यावा.
आधी पोटोबा मग विठ्ठोबा -
आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा.
अडला हरी गाढवाचे पाय धरी -
एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे -
अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
अति शहाणा त्याचा बैल रिकामा -
जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.
आधी शिदोरी मग जेजूरी -
आधी भोजन मग देवपूजा
असतील शिते तर जमतील भुते -
एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
आचार भ्रष्टी सदा कष्टी -
ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.
आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली -
अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
आईचा काळ बायकोचा मवाळ -
आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास -
मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
आपलेच दात आपलेच ओठ -
आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.
अंथरूण पाहून पाय पसरावे -
आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
आवळा देऊन कोहळा काढणे -
क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
आलीया भोगाशी असावे सादर -
कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे
अचाट खाणे मसणात जाणे -
खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.
आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते -
अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते.
आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला -
ज्या दोषाबद्दल आपण दुसर्याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे.
आपला तो बाब्या दुसर्याचं ते कारटं -
स्वत:चे चांगले आणि दुसर्यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.
अळी मिळी गुप चिळी -
रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.
अहो रूपम अहो ध्वनी -
एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
From Marathi Mhani app:
ज्याला नाही अक्कल, त्याची घरोघरी नक्कल.
Meaning:
मूर्ख किंवा निर्बुद्ध माणसाचा घरोघरी उपहास होतो.