MPSC, PSI, STI, ASO, Dept. PSI, Group C, TCS, IBPS,, Talathi, Police व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी...... ॲड.डॉ.आशालता गुट्टे
SSC JE पेपर २, ६ नोव्हेंबर रोजी होणार
Читать полностью…Mpsc: हजारो कोटिचा खर्च, नोकऱ्या किती?
Читать полностью…उत्तरप्रदेशमध्ये पुढील 2 वर्षात 1 लाख पदांची पोलीस भरती होणार
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
महत्त्वाचे समानार्थी शब्द :
(०१) अनल - विस्तव, पावक, अग्नी, वन्ही
(०२) डोळा - नयन, लोचन, चक्षु, नेत्र
(०३) वीज - चपला, तडित, बिजली, सौदामिनी
(०४) ज्ञानी - शहाणा, डोळस, जाणकार, सुज्ञ
(०५) वस्त्र - पट, अंबर, वसन, कपडा
(०६) भुंगा - भ्रमर, अली, मिलिंद, मधुप
(०७) पत्नी - भार्या, बायको कांता, दारा, जाया
(०८) युद्ध - रण, समर, संगर, संग्राम, लढाई
(०९) वानर - कपी, मर्कट, शाखामृग
(१०) क्षय क्षीण, नाश, ऱ्हास
(११) अही साप, सर्प, भुजंग
(१२) दुध पय, क्षीर, दुग्ध
(१३) नदी - सरिता, तटिनी, तरंगिणी
(१४) स्री - ललना, महिला, वनिता, नारी, अबला
(१५) शत्रू - अरी, रिपू, वैरी, दुश्मन
(१६) लक्ष्मी - श्री, रमा, कमला, इंदिरा, वैष्णवी
(१७) पृथ्वी - धरणी, अवनी, भूमी, वसुंधरा
विद्यार्थी मित्रांच्या विनंतीवरून..
कृषी सेवा जागा 258 समाविष्ट झाले पाहिजे तसेच IBPS आणि राज्यसेवा एकाच दिवशी होत आहे विद्यार्थी मित्रांचे त्या ठिकाणी देखील कोणतेही नुकसान होऊ नये कारण....
1) बेरोजगारीचा दर विचारात घेतला तर रोजगार निर्मिती होणे तेवढेच गरजेचे आहे.
2) विद्यार्थी मित्र दोन्ही परीक्षा देत असतात अशा विद्यार्थी मित्रांचे देखील यामध्ये वार्षिक नुकसान होऊ शकते.
3) वर्षभरात होणारे खर्च देखील मोठ्या प्रमाणात होतात...
4) स्पर्धा परीक्षांमध्ये बहुतांश विद्यार्थी ग्रामीण आणि शेतकऱ्यांची आहेत वर्षभर ते परीक्षा होणार याच आशेने बघत असतात तरी जर त्यांना परीक्षा देता आली नाही त्यांचे वार्षिक नुकसान होते..
इतर सर्व बाबी विचारात घेता कृषी च्या जागा समाविष्ट होणे गरजेचे तसेच IBPS आणि राज्यसेवा पूर्व देणारे यांना सुद्धा न्याय मिळेल असाच निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही आमची सर्वांचीच मायबाप सरकारला विनंती आहे...
PMC : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना..
पुणे महानगरपालिका
🤝 जागा - 682
अर्ज दिनांक : 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2024
पात्रता आणि विद्यावेतन
12 वी पास : रु.6,000/-
आय.टी.आय./पदविका : रु.8,000/-
पदीधर/पदव्युत्तर : रु.10,000/-
अर्ज करण्यासाठी लिंक
https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index
♦️आरोग्य विभाग काही पदांसाठी 2/3 री वेटींग लिस्ट लावणे सुरु..
लिंक :
https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA==
✔️कृषी च्या 2⃣5⃣8⃣ जागा आयोगाला प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
✔️आता चेंडू आयोगाच्या कोर्टात
✔️सध्या तरी 25 ऑगस्ट वरच फोकस असावा कोर्टात
लिपिक टंकलेखक 2023
तुमची स्वतःची सर्व प्रक्रिया लवकर पूर्ण व्हायची इच्छा असेल तर तुमच्या आमदार/खासदार/नगरसेवक किंवा इतर प्रतिनिधी ला लवकरच कळवा.
https://www.instagram.com/reel/Cv7ulpENnDk/?igsh=MW5ueGRyeXVwcXpyOQ==
https://www.instagram.com/reel/C-l56ylILt2/?igsh=ZXowMTN2c3Myb3J6
https://youtube.com/shorts/cc2HKHKKAJk?feature=share
https://www.instagram.com/reel/C-ZAuunoJHG/?igsh=cTFoYmEzdGx5Ympm
https://youtube.com/shorts/htqIShEUtxs?feature=share
https://www.instagram.com/reel/C-Ozu-jogu_/?igsh=MTJkaWdrZW5ha3N0bA==
"'पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे"
आण्णा भाऊ साठे 🙏🏻💐
अप्रतिम रचना.....
माझी मैना गावावर राहिली !”
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
ओतीव बांधा | रंग गव्हाला |
कोर चंद्राची | उदात्त गुणांची |
मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची |
हसून बोलायची | मंद चालायची |
सुगंध केतकी | सतेज कांती |
घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची |
काडी दवन्याची |रेखीव भुवया |
कमान जणू इन्द्रधनुची | हिरकणी हिरयाची
काठी आंधल्याची | तशी ती माझी गरीबाची|
मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण |
नसे सुखाला वाण |
तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
श्रमकऱ्यांचा कैवार घेऊन अण्णा भाऊ साठेअन्यायाविरुद्ध सातत्याने लढत राहिले. हे जग बदलायचे असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आपल्याला जावे लागेल. हे सांगताना अण्णा भाऊ साठे म्हणतात, '"हे जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव.'"
अण्णा भाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ तर आईचे नाव वालुबाई होते. घरात प्रचंड गरिबी. दारिद्र्य हाच त्यांचा सखा नि सोबती होता. आण्णा भाऊंना वाटायचे आपण खुप शिकावे, म्हणून ते शाळेत गेले. गुरुजींनी त्यांना वर्गात बसू दिले नाही. एक दिवस ते वर्गाबाहेर बसूनच आत गुरुजी काय शिकवतात हे बाहेर बसून ऐकत होते. दुसऱ्या दिवशी धाडस करून ते वर्गात गेले. गुरुजींनी त्यांना दांडक्याने मारले. शिक्षण घेण्याच्या आशेने शाळेत गेलेल्या आण्णा भाऊंना मार खाऊनच घरी यावे लागले. ते फक्त दीड दिवस शिकले. पण पुढे जाऊन त्यांनी अक्षर ओळख करून घेतली आणि त्यांची प्रतिभेची गाडी सुसाट सुटली. गुणवत्ता आणि प्रतिभा ही कुणाची मक्तेदारी नाही. हे साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी जगाला दाखवून दिले.
वयाच्या दहाव्या वर्षी अण्णा भाऊ साठे आणि त्यांच्या परिवाराला वाटेगाव वरून मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे वाटेगाव ते मुंबई असा चारशे किलोमीटरचा प्रवास अण्णा भाऊंनी त्यांच्या परिवारासह पायीच सुमारे दोन महिने केला. उदरनिर्वाहासाठी कोळसे वेचायचे, झाडू मारायचा, ओझे उचलायचे; असे करत करत त्यांनी मुंबई गाठली. ज्या अण्णा भाऊंना वयाच्या दहाव्या वर्षी मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत, त्याच अण्णा भाऊ साठे यांना रशियन सरकारने विमानाने बोलावून रशियामध्ये त्यांचा मोठा आदर सन्मान केला. अण्णा भाऊ साठे म्हणजे रशियन जनतेच्या गळ्यातील ताईत होते. त्यांची साहित्य संपदा रशियन भाषेमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
अण्णा भाऊ साठे आपल्या शिष्टमंडळासह जेव्हा रशियामध्ये पोहोचले, तेव्हा तेथील शासनातील अधिकाऱ्यांनी त्यांना विचारले, "तुम्हाला काय पाहायला आवडेल. तेव्हा त्यांच्या शिष्टमंडळातील डॉक्टर म्हणाले आम्हाला या ठिकाणची वैद्यकीय सेवा पाहायची आहे. लोकप्रतिनिधी म्हणाले या ठिकाणी शासन व्यवस्था कशी चालते ते पाहायचे आहे. वकील मंडळी म्हणाली या ठिकाणची न्यायव्यवस्था पाहायची आहे. संगीतक्षेत्रातील सहकारी म्हणाले या ठिकाणचे कला, नाट्य, संगीत पाहायचे आहे. अण्णा भाऊ साठे म्हणाले, "'या ठिकाणचा मला फुटपाथ दाखवा आणि फुटपाथवर गोरगरीब कसे जगतात ते मला पाहयचे आहे". रशियामध्ये जरी गेले, तरी उपेक्षित, वंचित, गरिबांची नाळ कधी तुटली नाही. अण्णा भाऊ साठे संवेदनशील मनाचे होते.
अण्णा भाऊ साठे रशियात जाण्यापूर्वीच त्यांची कीर्ती रशियात पोहोचली होती, ती त्यांच्या साहित्यामुळे. तेथे त्यांना छत्रपती शिवाजी राजांवर अभ्यास करणारे प्राध्यापक चेलिशेव भेटले. कॉम्रेड पी. ए. बारनिकोव भेटले. रशियन लोकांना मराठी भाषा शिकविणाऱ्या प्राध्यापिका ततियाना कातेनीना भेटल्या, बाकु याठिकाणी हमीद साहेब भेटले. हमीद साहेब अण्णा भाऊंना पाहिल्या पाहिल्या म्हणाले "शाहिरी अझीज." रशियामध्ये अण्णा भाऊ साठे यांनी ताश्कंद, मास्को, स्टालिनग्राड, बाकू, अझरबैजान इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या. अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार झाला.
मास्को येथील सत्काराला उत्तर देताना अण्णा भाऊ म्हणाले, 'छत्रपती शिवाजी राजांच्या मराठी मुलखातून मी या ठिकाणी आलो आहे. मास्कोमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी राजांचा जयजयकार करणारे अण्णा भाऊ साठे होते.'फकिरा कादंबरीतील फकिरा म्हणतो, "'ही तलवार शिवाजीराजांनी माझ्या पूर्वजांना दिलेली तलवार आहे." गणपतीला वंदन करणारा गण बदलून, छत्रपती शिवाजी राजांना वंदन करणारा गण अण्णा भाऊंनी आणला. ते म्हणतात,
"प्रथम मायभूच्या चरणा ।
छत्रपती शिवबा चरणा ।
स्मरणी गातो कवणा ।"
छत्रपती शिवाजीराजे वरती अण्णा भाऊंची नितांत श्रद्धा होती. सर्वसामान्य रयतेचा वाली छत्रपती शिवाजी महाराज हे अण्णा भाऊ साठे यांचे प्रेरणास्थान होते.
आपल्या देशातील सर्वसामान्य जनतेला शिक्षण मिळावे. उत्तम आरोग्य मिळावे. दारिद्र्यातून मुक्तता व्हावी. सर्वांगीण विकासासाठी शांतता असावी. ही साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांची मनोमन इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आजन्म संघर्ष केला. अण्णा भाऊ साठे हे जनमाणसाचे कैवारी होते. स्वतः दुःख भोगून इथल्या कष्टकरी श्रमकरी वंचितांना आनंद मिळावा.
https://youtube.com/shorts/xfY76F_1gIU?feature=share
https://www.instagram.com/reel/C93g9hai5fl/?igsh=Z3I3anIzdnM0cHE4
एखादी व्यक्ती आरोपी आहे म्हणून घरावर बुलडोझर कसा काय चालवता?
Читать полностью…आज रात्री 12 नंतर कदाचित टेलिग्राम बंद होणार आहे. अशी बातमी येत आहे.
ज्यांनी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या....
https://chat.whatsapp.com/LWkYlaOR8EYAFYtqSprfIc
https://chat.whatsapp.com/ElG3uOXjMGm07qeo2eX5Eb
https://chat.whatsapp.com/HDoH4RwUk6y44x0a4gkMmz
https://chat.whatsapp.com/K8Ppo5kezEh0iavqPhidgb
https://chat.whatsapp.com/Dw05KOT8Oo609xZCwCBwl8
https://chat.whatsapp.com/ByK7B4Y0NQa5uRFaHJrJvQ
https://youtube.com/shorts/BJeqkjb6Z-k?feature=share
https://www.instagram.com/reel/C_CWoSRvqk2/?igsh=MWFwdjk3MTJ4dGxyZQ==
https://youtube.com/shorts/04KvTlXlu8s?feature=share
https://www.instagram.com/reel/C-6dlMIohWz/?igsh=MW83cHJnYTkyNXBwYg==
♦️महाज्योतीकडुन MBA CAT/CMAT CET परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता घेण्यात आलेल्या
👉 चाळणी परीक्षेची मेरीट यादी
(गुणाांकनानुसार)
♦️# ZP बुलढाणा DV आरोग्य सेवक 40% & 50%
Читать полностью…✅➡️स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले. चिरंजीवी प्रसाद, राजेंद्र डहाळे, सतीश गोवेकर यांना 'राष्ट्रपती पोलीस पदक' प्रदान करण्यात आले, तसेच १७ पोलीस शौर्य पदक आणि ३९ पोलिसांना ‘पोलीस पदक’ प्रदान केले गेले.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
https://youtube.com/shorts/ZsI554JWdB4?feature=share
https://www.instagram.com/reel/C-eTNSdIOfz/?igsh=M3d0a3FmNjd5MGd4
https://youtube.com/shorts/bf6ZJobrcvQ?feature=share
https://www.instagram.com/reel/C-RQxBmI2K9/?igsh=a3hhcWxqMzRwbGlp
यासाठी संघर्ष करणारा महायोद्धा म्हणजे साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे आहेत. दीड दिवस शाळां शिकणाऱ्या या महान साहित्यिकाने मराठी भाषेचा कैवार घेतला. जनमाणसांच्या मराठी भाषेला साहित्यात आणले. ज्या भाषेतील कलाकृती अनुवादित होते ती भाषा वृद्धिंगत होते. मराठी भाषेचा कैवार घेऊन मराठी भाषेला वृद्धिंगत करणाऱ्या या महामानवाची जयंती 'मराठी भाषा दिन' म्हणून जर साजरा झाला, तर निश्चितच मराठी भाषेचा आणि अण्णा भाऊंचा सन्मानच ठरेल. अण्णा भाऊनां जयंतीनिमत्त विनम्र अभिवादन 🙏💐
Читать полностью…*साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे : जागतिक स्तरावरील साहित्यिक*
ज्यांच्या वाट्याला फक्त दीड दिवसाची शाळा आली त्याच साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यक्षेत्रात जागतिक स्तरावर स्थान मिळविले. त्यांची साहित्य संपदा जगातील सुमारे 22 भाषांत अनुवादित झालेली आहे.
त्यांची चित्रा, सुलतान या कादंबऱ्या रशियामध्ये घरोघरी वाचल्या जातात, तर त्यांनी लिहिलेला स्टॅलिनग्राडचा पोवाडा रशियातील घराघरात गावागावात आणि शाळा-महाविद्यालयात गायला जातो. इतका तो प्रेरणादायी आणि लोकप्रिय आहे. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी 15 पोवाडे, एक नाटक, दहा लोकनाट्य, एक प्रवास वर्णन, तेवीस कथा आणि सुमारे 40 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. इतका प्रतिभासंपन्न आणि बहुविध साहित्यिक मराठी भाषेत दुसरा झाला नाही.
प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात, 'अण्णा भाऊंच्या कादंबरीची तुलना करणारी भारतीय भाषात दुसरी कादंबरी नाही. अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीची तुलना रशियन कादंबरीकार दोस्तोएवस्की यांच्याशीच होऊ शकते. यावरून स्पष्ट होते की अण्णा भाऊ साठे हे केवळ मराठी भाषा, महाराष्ट्र, भारत या चौकटीमध्ये मावणारे व्यक्तिमत्व नसून, ते जागतिक स्तरावरचे साहित्यिक ठरतात.
अण्णा भाऊ साठे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. कष्टकरी, कामकरी, शेतकरी वर्गाच्या हक्क अधिकारासाठी ते लढले. मुंबईसह मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या वाणीने -लेखणीने शाहीर अमर शेख ,शाहीर गव्हाणकर यांच्यासोबत ढवळून काढला.
'माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहिली' ही त्यांची छक्कड खूप गाजली. त्यांची ही छक्कड मराठी भाषेचे वैभव आहे. अत्यंत निस्वार्थ भावनेने त्यांनी सर्वसामान्य वंचित वर्गाच्या हक्कासाठी लढा दिला.
बालपणापासून त्यांच्या वाट्याला अत्यंत हलाखीचे जीवन आले.ओझी वाहिली, कोळसा वाचला, गिरणीत झाडू मारला. पोटासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत. संकटाला संधी समजून त्यांनी लढाऊ वृत्तीने त्यावरती मात केली. आण्णा भाऊ साठे संकटात खचून जाणारे नव्हते. तर संकटाच्या नरडीवर पाय देऊन यशाची शिखरे गाठणारे अण्णा भाऊ होते.
गोरगरिबांचे दारिद्र्य नष्ट व्हावे, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. आण्णा भाऊ म्हणत, 'दारिद्र हे फार क्रूर असते, आणि ते नग्न असते. ते नष्ट झाले पाहिजे.' यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. त्यांनी पंजाब दिल्लीचा दंगा, बंगालची हाक या कलाकृतीच्या माध्यमातून शांततेचे आवाहन केले. अण्णा भाऊ साठे म्हणत, 'शांतता ही पवित्र बाब आहे. दंगल करून आपला प्रश्न सुटणार नाही, तर शांततेच्या मार्गानेच आपले प्रश्न सुटतील.' अशी त्यांची भूमिका होती. गरिबांना न्याय मिळावा, ही त्यांची प्रामाणिक भूमिका होती.
अण्णा भाऊ साठे हे महान प्रतिभावंत साहित्यिक होते. परंतु साहित्याचा उपयोग त्यांनी समाजपरिवर्तनासाठी केला. एखादा प्रसंग उभा करण्यात त्यांचा हातखंडा होता. अचूक वर्णन करून एखादी व्यक्ती किंवा घटना याचे चित्रण करण्यात त्यांचा हातखंडा होता. प्राचीन काळामध्ये जनमानसाच्या मराठी भाषेला गाथासप्तशती, मध्ययुगीन काळात चक्रधरांचे लीळाचरित्र, संत नामदेवांची गाथा, संत तुकारामाचे अभंग, आधुनिक काळात महात्मा फुले यांचे साहित्य आणि साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य कवेत घेत इंग्रजाळलेल्या काळात जनमाणसाची मराठी साहित्यात आणली. आजचे आधुनिक साहित्यिक म्हणजे आण्णा भाऊ साठे आहेत. त्यामुळेच त्यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन झाला पाहिजे. तो मराठी भाषेचा आणि आण्णा भाऊंचा ही सन्मान ठरेल
अण्णा भाऊ साठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊ साठे असे आहे. आण्णा भाऊ साठे हे आधुनिक महाराष्ट्राचे तुकाराम आहेत. त्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, दारिद्र्य, विषमता यावरती कडाडून हल्ला केला. आज देखील आपल्या समाजामध्ये पृथ्वीची निर्मिती ईश्वराने देवाने केलेले आहे. जगाचा नियंता ईश्वरच आहे. हे सर्व जग सजीव सृष्टी ईश्वर चालवतो आहे. अशी अंधश्रद्धा आहे. परंतु आण्णा भाऊ साठे म्हणतात, 'पृथ्वी ही शेष नागाच्या फण्यावर तरलेली नसून ती कष्टकरी, श्रमकरी ,शेतकरी वर्गाच्या तळहातावर तरलेली आहे." श्रमकऱयांनी श्रम नाही केले तर धनदांडगे फक्त नोटा खाणार नाहीत.'
https://www.instagram.com/reel/C9w83pCNZUQ/?igsh=dnQxb2RmeHdwM3d2
Читать полностью…