आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi
🌷४) पुढील शब्दांवर अनुस्वार देऊ नये.
जसे - का, की, केळे, करू, करताना, रवेळू, घरात, घरी, जाऊ, तेथे, तेव्हा, जेथे, जेव्हा, झोप, नाव, नवे, पाच, बसू, माती, लाकूड, शाळेत. (कारण - या शब्दात अनुनासिकाचा स्पष्ट उच्चार होत नाही)
मराठी शुद्ध लेखनाचे नियम
अ)अनुस्वार
१) नाकापासून स्पष्टपणे उच्चार होणा-या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा.
उदा.
डोंगर, सतरंजी, धंदा, कुंभार, अंधार, पंचमी. इ.
🌷आधी भाषा, मग व्यकरण :
'🌷शुद्धलेखन' हा शब्दच थोडा फसवा आहे. आपले लेखन कशा प्रकारे करावे याबद्दल प्रारंभीच्या व्याकरणकारणी काही नियम ठरविले. त्याप्रमाणे जे लिहिले जाई ते त्या वेळी शुद्ध समजले जात असे.
🌷पूर्वी मराठीत अनुस्वार बऱ्याच ठिकाणी दिले जात. उदा. 'नाही' वर अनुस्वार द्यावा लागे. 'काही' मधल्या दोन्ही अक्षरांवर अनुस्वार देत. 'मी कामे केली' हे वाक्य 'मी कामें केली' असे सानुस्वार लिहावे लागे.
🌷याचे कारण त्या वेळच्या लोकांच्या बोलण्यात नासोच्चार खूप होते. त्यास अनुसरून, त्यात व्याकारणीक अनुस्वरांची भर घालून, तसेच अर्थभेद, व्युत्पत्तीने व परंपरा यांचाही विचार करून अनुस्वार कोठे द्यावेत व -हस्व - दीर्घ केव्हा लिहावे हे ठरविण्यात आले होते
🌷. आता आपण तसा उच्चार करत नाही. आपल्या उच्चारात आता खूप बदल झाला आहे. म्हणून हे अनुस्वार आजच्या लेखनातून नाहीसे झाले आहेत.
🌷जसे 'तो पुस्तक वाचतो', 'त्याने पुस्तक वाचले', 'त्याने पुस्तके वाचली' अशा ठरावीक पद्धतीनेच आपण बोलायला हवे. याऐवजी 'तो पुस्तक वाचला', 'त्याने पुस्तक वाचली', 'त्याने पुस्तके वाचतो' अशा पद्धतीने जर आपण बोललो तर ते चुकीचे ठरते.
🌷आपण लिहितो त्या शब्दाचे किंवा वाक्याचे शुद्ध स्वरूप कोणते व अशुध्द स्वरूप कोणते यांबाबत काही नियम ठरविण्यात आले आहेत. हे नियम हाच व्याकरणाचा विषय, व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजेच शुद्धलेखन. 'शुध्दलेखन' हा वेगळा असा विषय नाहीच. व्याकरणाचाच एक भाग आहे.
🌿शुद्धलेखन म्हणजे काय?🌿
आपण आपले विचार बोलून किंवा लिहून दाखवितो. आपल्या या बोलण्याला म्हणतात 'भाषा', व तेच लिहून दाखविण्याला 'लेखन' म्हणतात.
आपण बोलताना शब्दांचे उच्चार करतो. त्यांतील काही अक्षरे -हस्व असतात, काही दीर्घ असतात, तर काहींचा उच्चार नाकातून होतो. शब्दांतील या -हस्व - दीर्घ व सानुस्वार अक्षरांच्या उच्चाराप्रमाणे बोलणे म्हणजे शुद्ध बोलणे; व बोलण्यातील शुद्ध उच्चाराप्रमाणे ते अक्षरांत लिहून दाखविणे याला स्थूलमानाने 'शुद्धलेखन' म्हणायला हरकत नाही.
४. आत्मवृत्तात्मक निबंध :
कल्पना, विचार आणि भावना या तिन्हींची सांगड घालून प्रथम पुरुषी भाषेत, स्वत:विषयी लेखन करणे म्हणजे ‘आत्मवृत्तात्मक निबंध' होय. या निबंधात व्यक्ती, वस्तू, स्थान इत्यादि घटकांच्या अंतरंगात डोकावणे व त्या अनुषंगाने त्यांच्या सुख-दुःखाशी, अनुभवांशी एकरूप होऊन लेखन करणे महत्त्वाचे असते. मनोगत, कैफियत, कहाणी, आत्मकथन अशीही नावे ह्या निबंध प्रकारास योजली जातात.
२. कल्पनारम्य निबंध :
जी गोष्ट वास्तवात मिळत नाही किंवा जर ती मिळाली तर काय होईल, याची कल्पना करून ती शब्दांत मांडणे म्हणजे ‘कल्पनारम्य निबंध' होय. इथे कल्पना विस्ताराला भरपूर वाव असला तरी कल्पनेचा विस्तार मुद्देसूदपणे करून त्यात सुसंगती ठेवत निबंधाचा समारोप करताना कल्पनेतून बाहेर येणे महत्त्वाचे असते.
निबंध लेखनाचे प्रकार :
१. वैचारिक निबंध
२. कल्पनारम्य निबंध
३. वर्णनात्मक निबंध
४. आत्मवृत्तात्मक निबंध
निबंधाचा मध्यभागः
निबंधाचा मध्यभाग म्हणजे तुमचा खरा निबंध, जिथे निबंधाचा मूळ विचार स्पष्ट होत असतो. निबंधाच्या विषयाचा गाभा इथे दिसला पाहिजे. अनावश्यक बाबी टाळून मूळ विषय मांडावा. वेगवेगळी विशेषणे, क्रियापदे वापरून तीच तीच वाक्ये पुन्हा येणार नाहीत याची काळजी घ्यावी. प्रत्येक मुद्दा नवीन परिच्छेदात मांडावा. मुद्याला अनुसरून उदाहरणे, प्रसंग लिहावेत.
४. योग्य उदाहरणे, दाखल्यांच्या आधाराने मुद्दा अधिकाधिक प्रभावीपणे स्पष्ट करावा.
५. शेवटी निबंध लेखनाचा समारोप हा सुद्धा परिणामकारक असावा.
६. संपूर्ण निबंधात आपण मांडलेले विचार वाचकांना विचारप्रवण करणारे असावेत
निबध्यते अस्मिन इति'. जिच्यामध्ये विषय गुंफला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे 'निबंध'. अशी संस्कृतमध्ये निबंधाची व्याख्या केलेली आहे. तसेच निबंध ह्या शब्दाची फोड नि बंध अशी करता येते. त्याचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे, एकत्रित करणे असा आहे. आशयाच्या सुसंगत मांडणीस निबंध लेखनात फार महत्त्व आहे. योग्य, अर्थपूर्ण शब्दरचना उपमेय उपमांनी सजलेली सुंदर भाषा निबंधाची रंगत वाढवते.
Читать полностью…निबंधलेखन
'निबंध' या शब्दत 'नि' म्हणजे नीटनेटके, व्यवस्थित, पद्धतशीर आणि 'बद्ध' म्हणजे बांधलेले. ज्या लेखनात एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात येणारे विचार, भावना, कल्पना इ. कौशल्याने नीटनेटके बांधलेले असतात
निबंध म्हणजे विचार बांधणे, निबंध म्हणजे आधुनिक गद्य लेखनाचा प्रकार होय. निबंध म्हणजे नियमांनी बद्ध असणारे, नियोजित विचारांचे मुद्देसूद लेखन. निबंध विविध लांबीचे असू शकतात. शाळेमध्ये अगदी १० वाक्यांपासून ते ७०० वाक्यांपर्यंत निबंध लेखन विचारले जाऊ शकते. व्यावहारिक क्षेत्रात हे अगदी ३००० किंवा जास्त शब्दांपर्यंत जाऊ शकते.
) कौटुंबिक / घरगुती पत्रे
काही गोष्टी लक्षात घ्यावात –
१. पत्राच्या वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात पत्रलेखकाचे नाव, पत्ता, तारीख घालावी.
२. पत्र कोणत्या व्यक्तीला लिहीत आहोत, हे लक्षात घेऊन मायना लिहावा.
३. पत्रातील मजकूर लिहिताना योग्य तेथे परिच्छेद पाडावेत.
४. पत्राचा समारोप योग्य प्रकारे करावा. आईवडिलांना 'शिरसाष्टांग नमस्कार' किंवा 'शि.सा. नमस्कार' आणि कुटुंबातील इतरांना सा.न. / साष्टांग नमस्कार / नमस्कार / आशीर्वाद यांपैकी योग्य ते शब्द लिहावेत.
५. समारोपाचा योग्य मायना असावा. पत्राची भाषा सहज बोलल्यासारखी व घरगुती असावी.
संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त प्रश्नमंजूषा स्पर्धा
❗️संविधानावर ✊ आधारित प्रश्नमंजूषा असेल ❗️
😍 5 लाख रुपयांपर्यत बक्षीसे 🎉
🍐पहिले बक्षीस - 30000/-
🍐दुसरे बक्षीस - 20000/-
🍐 तिसरे बक्षीस - 15000/-
🍐 उत्तेजनार्थ - 10000/-
🍐स्पर्धा परीक्षा पुस्तक
🌷2) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा.
उदा.
लोकांना, मुलांकडून, मित्रांचे, घोड्यांसाठी, त्यांना इ.
🌷३) आदरार्थी अनेकवचनी (बहुवचनी) नामांच्या सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा.
उदा.
शिक्षकांनी, वडिलांनी, आजोबांनी, विवेकानंदांनी, रानडेंनी इ.
🌷पूर्वीच्या लेखनावर संस्कृतचा पगडा विशेष होता. त्यामुळे शब्दामध्ये येणारे इ-कार व उ-कार संस्कुतपामने -हस्व लिहिले जात. आता आपण मराठीचे लेखन मराठीच्या उच्चारानुसार लिहू लागलो आहे.
🌷प्रारंभी केलेल्या नियमांत आतापर्यंत वेळोवेळी बदल होत राहणार. भाषा बदलत चालली म्हणजे तिच्या लेखनपध्दतीतही बदल होणे साहजिक आहे. आधी भाषा बनते; मग तिचे व्याकरण ठरते.
🌷भाषेत बदल होत गेला की व्यकरणकारकाला शरणागती पत्करावी लागते व पूर्वीच्या नियमांना मुरड घालावीच लागते. परिणामतः लेखनविषयक ठरलेल्या नियमांतही बदल करावाच लागतो.
🌷लिहिण्याची शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे आपण बोलताना वर्णाचा जसा उच्चार करतो तसे लिहिणे. पण बोलण्यातील उच्चाराप्रमाणे लेखन करावयाचे तर आपली वर्णमाला अपुरी पडते. मराठीतील सगळे उच्चार लिहून दाखविण्याची सोय आपल्या वर्णमालेत नाही. तसेच, प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या उच्चारपद्धतीप्रमाणे लिहू लागला तर मोठा कठीण प्रसंग निर्माण होईल.
🌷एकमेकांचा विचार एकमेकांना समजायला हवा असेल तर एक विशिष्ट लेखनपध्दतीचा अनुसरणे भाग आहे. म्हणजेच लेखनाबाबत काही नियम ठरवून ते सर्वांनी आचरणात आणणे योग्य ठरते. अशा नियमांचा आपण 'शुद्धलेखनाचे नियम' म्हणत आलो.
🌷शुद्धलेखनात शब्दांतील -हस्व - दीर्घ अक्षरे व अनुस्वार यांचाच आपण प्रामुख्याने विचार करतो; पण शुद्धलेखन याचा एवद्याचाच विचार करतो; पण शुद्धलेखन याचा एवढाच मर्यादित अर्थ नाही.
🌷 शब्दांतील अक्षरांचे लेखन एवद्याचाच विचार यांच्याही शुद्धलेखनात कारवायचा नसून वाक्यात येणाऱ्या शब्दांचा क्रम व त्यांची अचूक योजना, जोडाअक्षरातील वर्णांची अचूक रचना, विरामचिन्हाचा योग्य वापर यांच्याही शुद्धलेखनात समावेश होतो.
🌷तसेच जोडशब्द तयार करताना शेजारचे वर्ण एकमेकांत मिसळतात; अनेक शब्दांचा एक शब्द करताना त्यातले काही शब्द कसे गळतात; व नवीनच शब्द कसे तयार केले जातात ( म्हणजेच संधी, समास व शब्दसिद्धी) यांच्याही विचार शुद्धलेखनात अवश्य करावा लागतो.
🌷आपण जे लिहितो ते शुद्ध म्हणजे निर्दोष असावे असे सर्वांना वाटते. हे लेखन शुद्ध व बिनचूक असावे याबद्दल काही नियम घालून देण्यात आलेले असतात. यांनाच 'शुद्धलेखनविषयक नियम' असे आपण म्हणतो.
🌷शुद्धलेखनाबाबतचे आजचे नियम पूर्वीपेक्षा कितीतरी सोपे झालेले आहेत. ते नीट समजावून घेतले की आपले लेखन निश्चित सुधारते.
🌷आपले विचार जसे इतरांना समजले पाहिजेत, तसे इतरांचे विचार आपल्याला समजायला हवेत. यासाठी आपली भाषा एका विशिष्ट ठरलेल्या पद्धतीनेच बोलली किंवा लिहिली गेली तरच ती 'शुद्ध' समजली जाते. त्यात काही चूक झाली तर ती अशुद्ध ठरते.
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
जॉईन - @eMPSCKatta
३. वर्णनात्मक निबंध :
आपण पाहिलेल्या एखाद्या घटनेचे, व्यक्तीचे, वास्तूचे किंवा प्रसंगाचे चित्र हुबेहूब शब्दांत रेखाटणे म्हणजे वर्णनात्मक निबंध' होय. या निबंध प्रकारात घटना, व्यक्ती, वास्तूचे केवळ बाह्यात्कारी वर्णन अपेक्षित नसते तर सूक्ष्म निरीक्षण शक्तीच्या आधारे ती घटना, व्यक्ती, वास्तू इ. चे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजे, असे ते वर्णन सहज व सोप्या भाषेत असणे आवश्यक असते.
१. वैचारिक निबंध :
वैचारिक निबंधात विचाराला महत्त्व असते. दिलेल्या विषयास अनुसरून आपल्याला आपले विचार मांडणे इथे अपेक्षित असते. विचार मांडताना सुद्धा त्यांची मांडणी सुसंगत असावी. त्यासाठी आवश्यक तेथे समर्पक उदाहरणे, शास्त्रीय दृष्टिकोन, संदर्भाचाही वापर करावा. विषयाच्या सर्व पैलूंची म्हणजे सकारात्मक व नकारात्मक मुद्द्यांची मांडणी करावी. विचारांची अशी खंडण-मंडनात्मक मांडणी करून शेवटी निष्कर्षाप्रत यावे.
निबंधाचा शेवटः
निबंधाचा शेवट हा वाचकाच्या स्मरणात रहात असतो, म्हणूनच निबंधाची आकर्षक सुरुवात लक्षात घेऊन शेवटही आकर्षक व परिणामकारक करावा. यात आपण संपूर्ण निबंधात मांडलेले विचार, आपले म्हणणे वाचकाला विचार करायला लावणारे असावे. आपल्या पूर्ण निबंधातील मुद्दे, विचार यांचे सार त्यात असावे, जेणेकरून वाचकाला संपूर्ण निबंध त्या शेवटच्या परिच्छेदात आठवेल. आपले विचार अत्यंत स्पष्टपणे मांडण्याचे कसब आपल्याकडे असायला हवे.
निबंधाची सुरुवातः
निबंधाची सुरुवात विषय लक्षात घेऊन आकर्षक करावी. त्या विषयाची व्याख्या देऊन, एखाद्या कवितेच्या ओळी देऊन, एखादा प्रसंग सांगून, एखादी वर्तमानपत्रातील बातमी सांगून, एखादी म्हण, सुविचार किंवा वाक्प्रचार सांगून, एखादी गोष्ट सांगून किंवा एखादा संवाद थोडक्यात देऊन निबंधाची सुरुवात करता येईल. निबंधातील आकर्षक सुरुवातीमुळे तुम्ही वाचकाला निबंध वाचण्यास प्रवृत्त केले पाहिजे.
निबंधलेखनाचे तंत्र -
निबंध लेखनाचे स्वत:चे असे एक विशिष्ट तंत्र आहे.
१. आकर्षक सुरुवात, विषयविवेचन व निबंधाचा योग्य समारोप ही निबंध लेखनाची महत्त्वाची अंगे आहेत.
२. निबंध विषयाशी सुसंगत असे काही सुविचार, काव्यपंक्ती, सुभाषिते किंवा एखाद्या घटना प्रसंगाने निबंधाची आकर्षक सुरुवात करता येते.
३. विषय विवेचन करताना त्यात विचारांचा मुद्देसूदपणा आवश्यक आहे.
निबंध म्हणजे विचारांची गुंफण, विचारांची जुळवाजुळव करणे. जेव्हा आपण एखाद्या विषयावर विचार करतो तेव्हा खूप विविध प्रकारचे विचार आपल्या मनात येतात. काही सकारात्मक तर काही नकारात्मक, ते विस्कळीत असतात. त्यांची मुद्देसूद मांडणी करणे म्हणजेच निबंध लेखन. शालेय निबंध लेखन औपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये निबंध लेखन हे खूप महत्वाचे साधन आहे.
निबंध लेखनाचे स्वत:चे असे एक कौशल्य असते. वाचन, लेखन व सरावाच्या माध्यमातून हे कौशल्य विकसित करता येते. निबंध लेखनामुळे आपण आपल्या मनातील विचारांचे, भावनांचे, कल्पनांचे विषयांच्या अनुषंगाने सूत्रबद्ध रीतीने प्रकटीकरण करू शकतो.
२) व्यावसायिक पत्र
१. व्यावसायिक पत्रात, पत्राच्या वरच्या भागात '।।श्री।।' वगैरे शुभदर्शक काहीही लिहिण्याची गरज नाही.
२. पत्राची सुरुवात करताना वरती उजव्या कोपऱ्यात पत्ता लिहिण्यापूर्वी आपले पूर्ण नाव लिहावे. त्याखाली पूर्ण पत्ता पिनकोडसहित लिहावा.
३. पत्र ज्याला लिहायचे आहे त्याचे नाव आणि संबंध लक्षात घेऊन मायना लिहावा.
४. त्याखाली पत्राचा विषय व काही संदर्भ असल्यास तोसुद्धा लिहावा.
५. योग्य, नेटक्या शब्दांत मजकूर लिहावा. परिच्छेद पाडावेत. पाल्हाळ असू नये.
६. 'आपला विश्वासू' 'आपला कृपाभिलाषी' या शब्दांनी शेवट करून स्वाक्षरी करावी.
🍀पत्रलेखन🍀
🌷आज जग जवळ आले आहे. म्हणजे जगात दूरवर असलेल्यांना एकमेकांशी संपर्क साधण्याचे विविध मार्ग आज उपलब्ध आहेत.
उदा. दूरध्वनी, संगणक, इंटरनेट इत्यादी. तरीपण आजही माणसे एकमेकांना पत्रे लिहीत असतात. पत्राच्या माध्यमातून आपण आपले मन दुसऱ्याजवळ व्यक्त करू शकतो. म्हणून पत्रलेखन आजही अपरिहार्य आहे.
पत्राचे मुख्य २ प्रकार :
१) कौटुंबिक / घरगुती पत्र
२) व्यावसायिक पत्र