आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi
कथेमध्ये रंजकता असावी. कथेत कल्पनेतून मांडलेले प्रसंग व घटना आपण प्रत्यक्ष पाहत आहोत, असे वाचकाला वाटले पाहिजे.
कथेची भाषा साधी, सोपी व चटकन समजणारी असावी. कथा बोधप्रद असावी.
कथालेखन हा प्रकार लिहिण्यास सोपा आहे. या प्रकारात कथेतील मुख्य घटना, सुरुवात व शेवट मुद्द्यांच्या आधारे सांगितलेला असतो.
त्या मुद्द्यांच्या आधारे कथा खुलवायची असते. कथेतील भाषा ओघवती असावी व पाल्हाळीक नसावी
दिलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांची उत्तरे उताऱ्यातून शोधून काढून स्वतःच्या शब्दांत लिहावीत.
ती उत्तरे लिहिताना उताऱ्यातील वाक्ये जशीच्या तशी उतरवून काढू नयेत. दीर्घ व आलंकारिक वाक्यरचना करू नये
. सोप्या शब्दांत आणि सुटसुटीत वाक्यांत उत्तरे लिहावीत.
🌺कल्पनाविस्तार करताना पुढील बाबी उपयुक्त ठरतात🌺
श्रवण, वाचन, संभाषण, निरीक्षणे ही कौशल्ये आत्मसात केल्यास कल्पनाविस्तार करताना आपली अभिव्यक्ती अधिक प्रभावी व ज्ञानसमृद्ध होते.
बहुश्रुत व व्यासंगी व्यक्तीच्या लेखनात त्याच्या ज्ञानाची, माहितीची छाप कायमच पडते. यासाठी आपला व्यासंग वाढवावा, जेणेकरून लेखन सशक्त व परिणामकारक होते.
भाषा ओघवती, सुलभ परंतु तरीही लालित्यपूर्ण असावी.
शब्दयोजना करताना व्यवस्थित विचार करावा, कारण नेमकी शब्दयोजना केल्यास कल्पना किंवा विचार अधिक सुस्पष्टपणे मांडता येतो.
आपला शब्दसंग्रह विपुल असावा. वेगवेगळ्या म्हणी, वाक्प्रचार संग्रही असावेत. योग्य ठिकाणी उचित म्हणींचा किंवा शब्दांचा नेमका वापर केल्यास कल्पनाविस्तार अधिक चांगल्याप्रकारे मांडला जातो.
लेखनात विशेषणे, क्रियाविशेषणे यांचा वापर करून भाषेला सजवावे, अलंकृत करावे.
कल्पनाविस्तार हा विचारांना, कल्पनेला चालना देणारा, अलंकारिक, प्रासादिक भाषेने सजलेला असा लेखनकलेचा उत्तम नमुना होय. लघुनिबंधाचे एक प्राथमिक रूप म्हणजेच कल्पनाविस्तार असे म्हणता येईल
🌿कल्पनाविस्तार :🌿
कल्पनाविस्तार म्हणजे एखाद्या ओळीतील कल्पनेचा अर्थ विस्ताराने स्पष्ट करणे. शब्दशः अर्थाबरोबरच त्या ओळीतून सूचित होणारा गर्भितार्थ, लक्ष्यार्थ समजून घेऊन त्या वेगवेगळ्या अर्थछटांचे स्पष्टीकरण करावे लागते.
विविध दाखले, उदाहरणे देऊन लालित्यपूर्ण लेखन करून त्या कल्पनेतील विविध अर्थ वाचकापर्यंत पोहोचवणे म्हणजे कल्पनाविस्तार.
सुवचन, सुभाषित, काव्यपंक्ती, म्हण यांचा कल्पनाविस्तार केला जातो.
🌿७) स्थायीभाव – जुगुप्सा
रसनिर्मिती – बीभत्स
हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.
उदा –
मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.
🌿८) स्थायीभाव – विस्मय
रसनिर्मिती- अदभुत
हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात
उदा –
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
Читать полностью…कथालेखन करताना काही मुद्दे -
सर्व मुद्दे काळजीपूर्वक वाचावेत.
कथेतून जो बोध द्यायचा आहे ती मध्यवर्ती कल्पना समजून घ्यावी.
कथेतील वर्णन भूतकाळात लिहावे.
आकर्षक पद्धतीने कथेचा प्रारंभ करावा.
आवश्यक असेल तेथे संवादांचा वापर करावा. संवादांत योग्य त्या विरामचिन्हांचा वापर करावा.
तीन-चार परिच्छेदांत कथालेखन करावे.
कथेतील घटनेनुसार कथेस समर्पक शीर्षक द्यावे. तात्पर्य लिहिले तर समारोप परिणामकारक ठरतो.
🌿कथालेखन🌿
मुद्यांवरून कथालेखन
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एखादी गोष्ट तयार करून लिहिणे म्हणजे कथालेखन होय.
एखादी घडलेली घटना किंवा प्रसंग आकर्षकरितीने कथारूपाने सांगणे म्हणजे कथालेखन.
मनोरंजक कथा सर्वांना वाचावीशी आणि ऐकवीशी वाटते. कथेचा प्रारंभ उत्सुकता वाढविणारा असावा.
कथेमध्ये रंजकता असावी. कथेत कल्पनेतून मांडलेले प्रसंग व घटना आपण प्रत्यक्ष पाहत आहोत, असे वाचकाला वाटले पाहिजे.
कथेची भाषा साधी, सोपी व चटकन समजणारी असावी. कथा बोधप्रद असावी.
🌾गद्यआकलन🌾
दिलेला गद्य उतारा वाचून त्यातील मुख्य व महत्त्वाचा विचार किंवा विषय समजून घेणे म्हणजे उताऱ्याचे आकलन होय.
एखाद्या पुस्तकातील उतारा देऊन त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. उताऱ्याचे आकलन झाले की त्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात.
दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यापूर्वी दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचावा. त्यातील माहिती बारकाईने समजून घ्यावी. उताऱ्यात कोणते तत्त्व किंवा विचार पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते जाणून घ्यावे.
कल्पनाविस्तारातील पायर्या
१. सुरुवातीला कल्पनेचा अर्थ मांडावा.
२. विविध उदाहरणे देऊन कल्पना स्पष्ट करावी.
३. मतितार्थ समजावून देण्यासाठी इतिहासातील, पुराणातील, तत्कालीन दाखल्यांचा वापर केल्यास आशय अधिक परिणामकारकतेने वाचकापर्यंत पोहोचतो.
४. शेवटी नेमकेपणाने, पूर्ण निबंधाचे सार मोजक्या शब्दांत सांगावे.
🌿कल्पनाविस्तार🌿
आपल्या जीवनात प्रत्येक प्रसंगी भाषा ही फार महत्त्वाची भूमिका साकारत असते. प्रत्येकाला व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी भाषेची मदत घ्यावी लागते.
जेवढे भाषिक ज्ञान अधिक तेवढीच आपली आकलन शक्तीही सुधारण्यास संधी मिळते. भाषेचा अभ्यास परिपूर्ण होण्यासाठी श्रवण, संभाषण, वाचन व लेखन ही कौशल्ये विकसित करणे महत्त्वाचे असते.
उत्तम लेखन ही एक कला आहे. ती कला ज्याला साध्य होते तो प्रतिभावान लेखक ठरतो. सर्जनशील लेखनामध्ये परिच्छेदलेखन, सारांशलेखन, दैनंदिनीलेखन, कथालेखन, पत्रलेखन, निबंधलेखन, कल्पनाविस्तार आदी लेखनप्रकारांचा समावेश होतो. आपण येथे कल्पनाविस्तार हा लेखनप्रकार अभ्यासणार आहोत.
🌿९) स्थायीभाव – शम (शांती)
रसनिर्मिती – शांत
हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.
उदा –
सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !
🌿५) स्थायीभाव – हास
रसनिर्मिती – हास्य
हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.
उदा –
मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.
🌿६) स्थायीभाव – भय
रसनिर्मिती- भयानक
हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.
उदा.
तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.